शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शाहू महाराजांची परिवर्तन चळवळ दिशादर्शक : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:19 IST

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़

विनोद गोळेपारनेर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़ त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला पद्मश्री, पद्मविभूषण तसेच देश-परदेशातील पुरस्कारांपेक्षाही मोठा आनंद देणारा आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असलेला पुरस्कार हजारे यांना जाहीर झाला आहे. बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. आतापर्यंत आपण केलेल्या आंदोलनाच्या यशाचे गमक काय? असा प्रश्न विचारल्यावर, आपण कोणत्याही व्यक्ती, पक्ष, किंवा समूहाविरोधात आंदोलन केलेले नाही. समाजाचे हक्क व कर्तव्ये मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक चळवळीत काम करताना स्वत: शुध्द चारित्र्य व जीवन निष्कलंक असले पाहिजे, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात पाहिजे. त्यालाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे.अहिंसात्मक आंदोलन हेच यशआजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. त्यात नेहमी आपल्या आंदोलनामुळे सामान्य माणसाला किंवा समाजाला त्रास होणार नाही, याची मी सातत्याने काळजी घेतली़ आंदोलन अहिंसात्मक असावे, यासाठी काटेकोर पालन केले. सन २०११ मध्ये दिल्लीत आंदोलन केले. त्यावेळी देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जगभरात आंदोलने शांततेत झाली. त्याचे जगभरातून कौतुक झाले. शांततेच्या मार्र्गाने आंदोलन केल्यानेच देशाला लोकपाल कायदा, लोकायुक्त, माहितीचा अधिकार, ग्रामसभेला अधिकार, बदल्यांचा कायदा, दारूबंदीसाठी ग्रामसभेला अधिकार यासह अनेक कायदे झाल्याचे हजारे यांनी सांगितले.अन् एक कोटी रूपयांचा पुरस्कार नाकारलाआजपर्यंत देशात, परदेशात अनेक पुरस्कार व कोट्यवधी रूपयांचे पुरस्कार मिळाले़ पण आपण नेहमी पुरस्कार कोण देतोय, याची खातरजमा केली. त्यामुळेच दिल्लीमध्ये एक संस्था देत असलेला एक कोटी रूपयांचा पुरस्कार आपण नाकारल्याचे हजारे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे