शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांची परिवर्तन चळवळ दिशादर्शक : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:19 IST

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़

विनोद गोळेपारनेर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़ त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला पद्मश्री, पद्मविभूषण तसेच देश-परदेशातील पुरस्कारांपेक्षाही मोठा आनंद देणारा आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असलेला पुरस्कार हजारे यांना जाहीर झाला आहे. बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. आतापर्यंत आपण केलेल्या आंदोलनाच्या यशाचे गमक काय? असा प्रश्न विचारल्यावर, आपण कोणत्याही व्यक्ती, पक्ष, किंवा समूहाविरोधात आंदोलन केलेले नाही. समाजाचे हक्क व कर्तव्ये मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक चळवळीत काम करताना स्वत: शुध्द चारित्र्य व जीवन निष्कलंक असले पाहिजे, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात पाहिजे. त्यालाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे.अहिंसात्मक आंदोलन हेच यशआजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. त्यात नेहमी आपल्या आंदोलनामुळे सामान्य माणसाला किंवा समाजाला त्रास होणार नाही, याची मी सातत्याने काळजी घेतली़ आंदोलन अहिंसात्मक असावे, यासाठी काटेकोर पालन केले. सन २०११ मध्ये दिल्लीत आंदोलन केले. त्यावेळी देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जगभरात आंदोलने शांततेत झाली. त्याचे जगभरातून कौतुक झाले. शांततेच्या मार्र्गाने आंदोलन केल्यानेच देशाला लोकपाल कायदा, लोकायुक्त, माहितीचा अधिकार, ग्रामसभेला अधिकार, बदल्यांचा कायदा, दारूबंदीसाठी ग्रामसभेला अधिकार यासह अनेक कायदे झाल्याचे हजारे यांनी सांगितले.अन् एक कोटी रूपयांचा पुरस्कार नाकारलाआजपर्यंत देशात, परदेशात अनेक पुरस्कार व कोट्यवधी रूपयांचे पुरस्कार मिळाले़ पण आपण नेहमी पुरस्कार कोण देतोय, याची खातरजमा केली. त्यामुळेच दिल्लीमध्ये एक संस्था देत असलेला एक कोटी रूपयांचा पुरस्कार आपण नाकारल्याचे हजारे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे