शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शाहू महाराजांची परिवर्तन चळवळ दिशादर्शक : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:19 IST

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़

विनोद गोळेपारनेर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक समता निर्माण केली. त्यांनी समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट करण्यासाठी राबविलेली परिवर्तन चळवळ आज दिशादर्शक ठरत आहे़ त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मला पद्मश्री, पद्मविभूषण तसेच देश-परदेशातील पुरस्कारांपेक्षाही मोठा आनंद देणारा आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असलेला पुरस्कार हजारे यांना जाहीर झाला आहे. बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. आतापर्यंत आपण केलेल्या आंदोलनाच्या यशाचे गमक काय? असा प्रश्न विचारल्यावर, आपण कोणत्याही व्यक्ती, पक्ष, किंवा समूहाविरोधात आंदोलन केलेले नाही. समाजाचे हक्क व कर्तव्ये मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक चळवळीत काम करताना स्वत: शुध्द चारित्र्य व जीवन निष्कलंक असले पाहिजे, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात पाहिजे. त्यालाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे.अहिंसात्मक आंदोलन हेच यशआजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. त्यात नेहमी आपल्या आंदोलनामुळे सामान्य माणसाला किंवा समाजाला त्रास होणार नाही, याची मी सातत्याने काळजी घेतली़ आंदोलन अहिंसात्मक असावे, यासाठी काटेकोर पालन केले. सन २०११ मध्ये दिल्लीत आंदोलन केले. त्यावेळी देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जगभरात आंदोलने शांततेत झाली. त्याचे जगभरातून कौतुक झाले. शांततेच्या मार्र्गाने आंदोलन केल्यानेच देशाला लोकपाल कायदा, लोकायुक्त, माहितीचा अधिकार, ग्रामसभेला अधिकार, बदल्यांचा कायदा, दारूबंदीसाठी ग्रामसभेला अधिकार यासह अनेक कायदे झाल्याचे हजारे यांनी सांगितले.अन् एक कोटी रूपयांचा पुरस्कार नाकारलाआजपर्यंत देशात, परदेशात अनेक पुरस्कार व कोट्यवधी रूपयांचे पुरस्कार मिळाले़ पण आपण नेहमी पुरस्कार कोण देतोय, याची खातरजमा केली. त्यामुळेच दिल्लीमध्ये एक संस्था देत असलेला एक कोटी रूपयांचा पुरस्कार आपण नाकारल्याचे हजारे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे