शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ऑक्सिजन अभावी सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST

अहमदनगर : येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने ...

अहमदनगर : येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने लगेच संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने नव्हे तर कोरोना आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे झाल्याची सारवासारव केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई आहे. जिल्ह्यासाठी रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी २० तर मंगळवारी ५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने तो ऑक्सिजन अपुरा पडत आहे. उपलब्ध झालेला ५० टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालय व शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयात पाठवला जातो. याबाबत समप्रमाणात व न्याय्य पद्धतीने वाटप होत नसल्याने अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने तेथील रुग्णांचा जीव ऑक्सिजन अभावी गुदमरला आहे. याकडे लक्ष द्यायला प्रशासनाकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळावा यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कोणतेही नियोजन होत नसल्याचे दिसते आहे. यामुळे ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. तिथे रांगा असल्याने खासगी रिफिलिंग प्लांटवर दहा ते बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. हीच परिस्थिती एका खासगी रुग्णालयातील रुग्णांवर बेतली व त्यातच त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

---

प्रशासन पोहोचले हॉस्पिटलमध्ये

दरम्यान एका खासगी रुग्णालयात सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’सह अन्य माध्यमांनी ऑनलाईनवर प्रसिद्ध करताच आरोग्य यंत्रणेने ‘त्या’ खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथील डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर सदर मृत्यू ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून झाले नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान पोलीस यंत्रणेने ही हॉस्पिटल भोवती पहारा दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनीही सदर हॉस्पिटला भेट देऊन चौकशी केली.

---------------

त्या खासगी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू हा एकाच वेळी नव्हे तर २४ तासांमध्ये झालेला आहे. संबंधित हॉस्पिटलला ऑक्सिजनचा आवश्यक तेवढा साठा उपलब्ध होता. गुंतागुंतीच्या आजारामुळे येथील रुग्ण आधीच गंभीर होते. त्यात कोरोनाची बाधा झाल्याने ते आणखी गंभीर बनले होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याचे त्यांचा मृत्यू झाला.

-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक

-----------

जिल्हाधिकारी म्हणतात, अफवांवर विश्वास ठेवू नका

सात जणांच्या मृत्युची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सदरचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता आहे. मंगळवारी दिवसभरात ४९ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला असून बुधवारीही तेवढाच ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे. जिल्ह्याता तेवढाच कोटा असून त्याप्रमाणे ऑक्सिजन मिळत आहे. तो सर्व खासगी रुग्णालयांना दिला जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.