शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचे अन्नदानापासून अंत्यसंस्कारांपर्यंतचे सेवाव्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST

कोरोना प्रादुर्भावामुळे २२ मार्च २०२० ला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. ...

कोरोना प्रादुर्भावामुळे २२ मार्च २०२० ला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. या संकटात संगमनेरातील हातावर पोट असणाऱ्या गरजू नागरिकांचे, मंदिरांबाहेर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे उपासमारीने हाल होऊ नयेत, म्हणून कुटुंब फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना दररोज दोन वेळचे जेवण पुरविले जायचे. रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जायची. कुठलेही शुल्क न घेता जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोहोच दिल्या जात होत्या. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना चहापाणी, नाश्ता, जेवण देखील दिले जायचे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत फाउंडेशनच्या तरुणांची प्रशासनाला मोठी मदत झाली व होते आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढून दुसऱ्या लाटेत परिस्थिती अंत्यत गंभीर बनते आहे. रुग्णांना उपचार मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. संगमनेरातील रुग्णालयांमध्ये स्थानिक व बाहेरगावातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचे जीव गेले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेकदा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक जवळ नसतात. यातील काही नागरिक बाहेरगावचे असल्याने त्यांना मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे, कुठे करावेत? याबाबत काहीही माहिती नसते. अशावेळी संबंधित रुग्णालयातून फोन आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी फाउंडेशनचे सदस्य शववाहिका घेऊन तेथे पोहोचतात. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांच्याकडून फाउंडेशनच्या तरुणांना पीपीई कीट मोफत दिल्या जातात. कुटुंब फाऊंडेशनच्या तरुणांनी गेल्या वीस दिवसांत ३३ जणांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.

-----------

हे समजल्यावर हात थरथरायला लागले

कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे आहेत, असा फोन आम्हाला रुग्णालयातून येतो. त्यावेळी आम्ही मृत व्यक्ती कोण आहे, ती कुठली आहे. कोणत्या जाती, धर्माची आहे याबाबत विचारणा करत नाही. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते; परंतु एकदा अंत्यसंस्कार करत असताना मृत व्यक्ती आपल्याच वयाची आहे. हे समजल्यावर हात थरथरायला लागले. भीती वाटली, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. असे अंत्यसंस्कारावेळी आलेले अनेक प्रसंग कुटुंब फाउंडेशनचे संस्थापक

प्रतीक जाजू यांनी सांगितले.

--------------

फाउंडेशनचे सदस्य

प्रतीक जाजू, रोहन मुर्तडक, प्रतीक जांभळे, वीरू सामल, सुमित भडकवाड, निखिल घाडगे, प्रतीक चत्तर, अक्षय देशमुख, राहुल नवले, सुयोग जगताप, अक्षय सानप, ओंकार गोडसे, विनायक गुरुडकर, अक्षय वामन हे कुटुंब फाउंडेशनचे तरुण सदस्य अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत.