शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
2
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
3
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
4
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
5
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
6
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
9
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
10
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
11
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
12
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
13
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
14
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
15
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
16
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
17
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
19
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
20
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचे अन्नदानापासून अंत्यसंस्कारांपर्यंतचे सेवाव्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST

कोरोना प्रादुर्भावामुळे २२ मार्च २०२० ला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. ...

कोरोना प्रादुर्भावामुळे २२ मार्च २०२० ला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. या संकटात संगमनेरातील हातावर पोट असणाऱ्या गरजू नागरिकांचे, मंदिरांबाहेर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे उपासमारीने हाल होऊ नयेत, म्हणून कुटुंब फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना दररोज दोन वेळचे जेवण पुरविले जायचे. रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जायची. कुठलेही शुल्क न घेता जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोहोच दिल्या जात होत्या. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना चहापाणी, नाश्ता, जेवण देखील दिले जायचे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत फाउंडेशनच्या तरुणांची प्रशासनाला मोठी मदत झाली व होते आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढून दुसऱ्या लाटेत परिस्थिती अंत्यत गंभीर बनते आहे. रुग्णांना उपचार मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. संगमनेरातील रुग्णालयांमध्ये स्थानिक व बाहेरगावातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचे जीव गेले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेकदा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक जवळ नसतात. यातील काही नागरिक बाहेरगावचे असल्याने त्यांना मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे, कुठे करावेत? याबाबत काहीही माहिती नसते. अशावेळी संबंधित रुग्णालयातून फोन आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी फाउंडेशनचे सदस्य शववाहिका घेऊन तेथे पोहोचतात. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांच्याकडून फाउंडेशनच्या तरुणांना पीपीई कीट मोफत दिल्या जातात. कुटुंब फाऊंडेशनच्या तरुणांनी गेल्या वीस दिवसांत ३३ जणांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.

-----------

हे समजल्यावर हात थरथरायला लागले

कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे आहेत, असा फोन आम्हाला रुग्णालयातून येतो. त्यावेळी आम्ही मृत व्यक्ती कोण आहे, ती कुठली आहे. कोणत्या जाती, धर्माची आहे याबाबत विचारणा करत नाही. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते; परंतु एकदा अंत्यसंस्कार करत असताना मृत व्यक्ती आपल्याच वयाची आहे. हे समजल्यावर हात थरथरायला लागले. भीती वाटली, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. असे अंत्यसंस्कारावेळी आलेले अनेक प्रसंग कुटुंब फाउंडेशनचे संस्थापक

प्रतीक जाजू यांनी सांगितले.

--------------

फाउंडेशनचे सदस्य

प्रतीक जाजू, रोहन मुर्तडक, प्रतीक जांभळे, वीरू सामल, सुमित भडकवाड, निखिल घाडगे, प्रतीक चत्तर, अक्षय देशमुख, राहुल नवले, सुयोग जगताप, अक्षय सानप, ओंकार गोडसे, विनायक गुरुडकर, अक्षय वामन हे कुटुंब फाउंडेशनचे तरुण सदस्य अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत.