शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात पोलीस कर्मचाऱ्यावरील लाचलुचपतच्या कारवाईची गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST

हवालदार संजय रघुनाथ काळे याला शहर पोलीस ठाण्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले ...

हवालदार संजय रघुनाथ काळे याला शहर पोलीस ठाण्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. तक्रारदाराच्या नातवावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी काळे याने लाचेची मागणी केली होती. शहरात पोलीस कर्मचाऱ्यांचे पथ संचलन सुरू असताना ११ ऑगस्टला हा प्रकार घडला होता. घटनेनंतर हवालदार काळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काळे याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना घटनेनंतर जिल्हा पोलीसप्रमुखांना लेखी पत्र देण्याची वेळ आली आहे. हवालदार काळे याने ज्या गुन्ह्यासंबंधी लाचेची मागणी केली होती, त्यासंबंधीचा सविस्तर तपशील या पत्रात द्यावा लागला आहे. गुन्ह्याची सद्य:स्थिती तसेच न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख त्यावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी संगमनेर येथे डिसेंबर २०२० मध्ये पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख यांना एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले होते. या घटनेनंतर तेथील तत्कालीन पोलीस निरीक्षकांना नगर येथे मुख्यालयात बोलाविण्यात आले होते.

अकोले येथे तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या कार्यकाळात दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले होते. पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी निरीक्षक परमार यांची नगर येथे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली होती. एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यावर लाचलुचपतची कारवाई झाल्यास तेथील पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरण्याची भूमिका वरिष्ठांनी घेतल्याचे संगमनेर व अकोले येथील घटनांमधून दिसून आले. त्याचाच भाग म्हणून निरीक्षक सानप यांना लेखी म्हणणे सादर करावे लागले आहे.

---------

वर्षभरात पोलीस ठाण्यामध्ये ४०० गुन्हे दाखल होतात. सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाते. मात्र एखादा पोलीस कर्मचारी खोटेनाटे बोलून गैरप्रकार करत असेल तर जबाबदारी कोणाची?

- संजय सानप, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर