शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:20 IST

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे ...

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर थेट आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. ही हत्या १८ एकराच्या भूखंड प्रकरणातून झाल्याचा आरोप कर्डिले यांनी केला आहे. राज्यमंत्री तनपुरे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित भूखंड तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित असून, या भूखंडाबाबत पत्रकार दातीर यांनी कायदेशीर लढा सुरू केला होता. त्यामुळेच त्यांची हत्या झाली. त्यासंबंधीचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कर्डिले यांनी केला आहे.

दातीर हत्या प्रकरणात कर्डिले यांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. पत्रकार दातीर यांचे राहुरी येथून ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघा आरोपींना अटक केली आहे. यासंदर्भात बोलताना कर्डिले म्हणाले, राहुरी येथील पठारे नावाच्या शेतकऱ्याचा १८ एकराचा भूखंड होता. या भूखंडावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठवले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री तनपुरे यांच्याशी संबंधित असून, सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे, तसेच या कंपनीत तनपुरे यांचा सख्खा मेहुणा देशमुख व दातीर हत्याकांडातील फरार आरोपी कान्हू मोरे यांचा मुलगा यशवंत मोरे हे भागीदार आहेत. पठारे कुटुंबीयांनी दातीर यांना या भूखंडासंदर्भात मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर हे कायदेशीर लढाई लढत होते. यासंदर्भातच दातीर यांना आरोपींकडून अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या होत्या, असे कर्डिले यांनी सांगितले. दरम्यान, कर्डिले यांनी केलेल्या आरोपासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, पत्रकार परिषद घेऊनच यासंदर्भात बोलणार आहे.

.................

जमिनीच्या वादातून दातीर हत्याकांड, दोघांना अटक

राहुरी : राहुरी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ५ नंबर नाक्याजवळील १८ एकरच्या प्लाॅटवरून पत्रकार रोहिदास दातीर यांचा निर्घृण खूण करण्यात आला, अशी माहिती श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली. ८ एप्रिल रोजी सायंकाळी या घटनेतील आरोपी लाल्या ऊर्फ अर्जुन विक्रम माळी (वय २५, रा. जुने बसस्थानक, एकलव्य वसाहत) याला शेरी चिखलठाण येथून ताब्यात घेतले. ९ एप्रिल रोजी दुसरा आरोपी तौफिक मुक्तार शेख (वय २१, रा. राहुरी फॅक्टरी) याला विंचूर (ता. निफाड, जि. नाशिक) येथून अटक केली. मुख्य सूत्रधार कान्हू गंगाराम मोरे व अक्षय कुलथे हे दोन आरोपी अद्याप पसार आहेत.