शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर सेवाज्येष्ठता डावलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असले तरी त्यात नवा पेच निर्माण झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असले तरी त्यात नवा पेच निर्माण झाला आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या नवख्या शिक्षकांना थेट केंद्राध्यक्ष करण्यात आले आहे. सेवाज्येष्ठ व पदवीधर शिक्षकांना मात्र केंद्राध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मतदान अधिकाऱ्यांचे काम देण्यात आल्याने त्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असा प्रकार घडल्याने प्रशासनाकडे शिक्षक संघटनांनी तक्रारी केल्या आहेत.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्याकरिता सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी सायंकाळी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे निवडणुकांतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

बुधवारी निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरील कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी निवडणूक यंत्रणेला स्वत:च केलेली एक मोठी चूक दुरुस्त करावी लागेल. जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, नगर तालुक्यांसह अन्यत्र ही बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या अवघ्या चार- पाच वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांवर केंद्राध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर याउलट अनेक मुख्याध्यापक व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना केवळ मतदान अधिकारी करण्यात आले.

वास्तविक प्राथमिक शिक्षक हा डिप्लोमाधारक आहे. केंद्राध्यक्ष हा किमान पदवीधर असावा असे संकेत आहेत. त्यातही सेवाज्येष्ठतेला प्राधान्या द्यायला हवे. त्यांच्यावरच केंद्राध्यक्ष पद दिल्यास कामे व्यवस्थित पार पडतात. आपल्यापेक्षा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आदेश करणे त्यामुळे सोपे जाते. मात्र, यापूर्वीच्या सर्व निवडणुकांतील हे नियम डावलून प्रथमच असा प्रकार घडला आहे.

------------

सरसकट नियुक्त्या

केंद्र शाळेतील सर्वच शिक्षकांना सरसकट मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षाची नियुक्ती देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. अनेक दुर्धर आजाराचे व अपंग कर्मचारी यांनाही नियुक्त्या दिल्या गेल्या. मात्र, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्याने तो निर्णय रद्द करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देणे शक्यतो टाळता आले असते. मात्र, तसेही घडलेले नाही.

-------------

आपल्यापेक्षा ज्येष्ठ शिक्षक व मुख्याध्यापकांकडून कनिष्ठ मंडळी कामे कशी करून घेतील, हा प्रश्नच आहे. त्याविरुद्ध अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आली आहेत. प्रशासनाने तातडीने यावर उपाय शोधावा.

-शिक्षक समन्वय समिती, श्रीरामपूर.

------------