शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर सेवाज्येष्ठता डावलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असले तरी त्यात नवा पेच निर्माण झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असले तरी त्यात नवा पेच निर्माण झाला आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा परिषदेच्या नवख्या शिक्षकांना थेट केंद्राध्यक्ष करण्यात आले आहे. सेवाज्येष्ठ व पदवीधर शिक्षकांना मात्र केंद्राध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मतदान अधिकाऱ्यांचे काम देण्यात आल्याने त्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असा प्रकार घडल्याने प्रशासनाकडे शिक्षक संघटनांनी तक्रारी केल्या आहेत.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. त्याकरिता सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी सायंकाळी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे निवडणुकांतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

बुधवारी निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरील कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी निवडणूक यंत्रणेला स्वत:च केलेली एक मोठी चूक दुरुस्त करावी लागेल. जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, नगर तालुक्यांसह अन्यत्र ही बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या अवघ्या चार- पाच वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांवर केंद्राध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर याउलट अनेक मुख्याध्यापक व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना केवळ मतदान अधिकारी करण्यात आले.

वास्तविक प्राथमिक शिक्षक हा डिप्लोमाधारक आहे. केंद्राध्यक्ष हा किमान पदवीधर असावा असे संकेत आहेत. त्यातही सेवाज्येष्ठतेला प्राधान्या द्यायला हवे. त्यांच्यावरच केंद्राध्यक्ष पद दिल्यास कामे व्यवस्थित पार पडतात. आपल्यापेक्षा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आदेश करणे त्यामुळे सोपे जाते. मात्र, यापूर्वीच्या सर्व निवडणुकांतील हे नियम डावलून प्रथमच असा प्रकार घडला आहे.

------------

सरसकट नियुक्त्या

केंद्र शाळेतील सर्वच शिक्षकांना सरसकट मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्षाची नियुक्ती देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. अनेक दुर्धर आजाराचे व अपंग कर्मचारी यांनाही नियुक्त्या दिल्या गेल्या. मात्र, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्याने तो निर्णय रद्द करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देणे शक्यतो टाळता आले असते. मात्र, तसेही घडलेले नाही.

-------------

आपल्यापेक्षा ज्येष्ठ शिक्षक व मुख्याध्यापकांकडून कनिष्ठ मंडळी कामे कशी करून घेतील, हा प्रश्नच आहे. त्याविरुद्ध अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आली आहेत. प्रशासनाने तातडीने यावर उपाय शोधावा.

-शिक्षक समन्वय समिती, श्रीरामपूर.

------------