शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

चार हजार उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी चाळणी

By admin | Updated: April 9, 2016 23:37 IST

अहमदनगर : पोलीस भरतीच्या विविध चाचण्यांमध्ये मैदानी चाचण्यांमध्ये पन्नास टक्क्यांच्यावर गुण मिळविणारे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

अहमदनगर : पोलीस भरतीच्या विविध चाचण्यांमध्ये मैदानी चाचण्यांमध्ये पन्नास टक्क्यांच्यावर गुण मिळविणारे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार पोलीस मुख्यालयात राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत तब्बल चार हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांपैकी विविध वर्गवारीसाठी पात्र विद्यार्थ्यांमधून १: १५ या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. लेखी परीक्षा १७ एप्रिल रोजी घेण्यासाठी प्रशासन तयारी करीत आहे.नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाच्या ४९ जागांसाठी २९ मार्चपासून नगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली. ११ दिवस सुरू असलेली ही प्रक्रिया शनिवारी (दि. ९) समाप्त झाली. तप्त उन्हामुळे पहाटे साडेचार वाजल्यापासून मैदानी चाचणी घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी तैनात होते. यंदा प्रथमच महिला बचत गटातर्फे उमेदवारांना चहा-पाण्याची व्यवस्था केली होती. यंदाच्या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याने ही भरती प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली. या भरती प्रक्रियेत अनुकंपा तत्त्वावरील ३० जणांना बोलविण्यात आले होते. त्यामध्ये २२ हजर राहिले, तर ८ गैरहजर होते.परीक्षेस पात्र ठरलेल्यांची मंगळवारनंतर अंतिम यादी५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये पात्र समजण्यात येणार आहे. पास झालेल्या उमेदवारांपैकी १:१५ या प्रमाणात प्रत्येक कॅटेगिरीप्रमाणे उमेदवारांना १७ एप्रिल रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता मैदानी चाचणीमधील गुणांची यादी अहमदनगर पोलीस संकेतस्थळ आणि पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रकाशित करण्यात येणार आहे. गुणांबाबत कोणाचे काही आक्षेप असल्यास ते मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत नोंदविण्यात येणार आहेत. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे.