शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दुसऱ्यांदा संगमनेरातील ‘विजय रथोत्सव’ रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST

असा आहे ‘विजयरथोत्सवा’चा इतिहास विजय रथोत्सवावर १९२७ ते १९२९ अशी सलग तीन वर्षे ब्रिटीशांनी बंदी घातली होती. बंदीचा विरोध ...

असा आहे ‘विजयरथोत्सवा’चा इतिहास

विजय रथोत्सवावर १९२७ ते १९२९ अशी सलग तीन वर्षे ब्रिटीशांनी बंदी घातली होती. बंदीचा विरोध झुगारून १९२७ साली ब्रिटीशांनी अडविलेल्या रथाची पाच दिवसांनंतर व १९२८ साली दोन महिने पूजा केल्यानंतर हा रथ पुढे नेण्यात आला. २३ एप्रिल १९२९ साली हनुमान जन्ममोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी रथोत्सवावर बंदी घालण्यात आली. जन्मोत्सवाच्या पहाटे मंदिर परिसरासह मिरवणूक मार्गावर सुमारे पाचशे पोलिसांचा गराडा पडला. पहाटे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रथात दोन लहान मुलींनी हनुमानाची छोटी मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना अडवत ती मूर्ती पुन्हा मंदिरात नेऊन ठेवली. पोलीस मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहून अनेकजण घरी गेले. अचानक एवढ्यात दोनशे-अडीचशे महिलांनी एकत्र येऊन रथाचा ताबा घेतला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात महिलांची संख्या वाढली. पोलिसांनी त्यांच्याशी अनेक युक्तिवाद केले, भीती दाखविली, अटक करण्याची-खटले भरण्याची धमकीही दिली. परंतु आदिशक्तीचे रूप धारण केलेल्या महिलांनी रथ पुढे नेण्याचा निर्धार केला.

पोलिसांनी काही तरुणांना बेड्या घालून अटकेचा प्रयत्न केला व याच गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे व इतर महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन ‘बलभीम हनुमान की जय’असा गजर करीत रथाचा दोर ओढून तो पुढे नेला. तेव्हापासून प्रथम हा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे. पोलिसांनी मिरवणुकीने आणलेला केशरी ध्वज रथावर लावल्यानंतर त्यांच्या हस्ते मारूतीरायाच्या उत्सव मूर्तीची पूजा होऊन रथोत्सवाला सुरुवात होते.