शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

अहमदनगर : घाई-गडबडीत उरकलेले लग्न, त्यातच कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे एकमेकांकडून होणारा अपेक्षाभंग आदी कारणांमुळे वाद विकोपाला ...

अहमदनगर : घाई-गडबडीत उरकलेले लग्न, त्यातच कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणीमुळे एकमेकांकडून होणारा अपेक्षाभंग आदी कारणांमुळे वाद विकोपाला जाऊन गेल्या पाच महिन्यांत येथील भरोसा सेलकडे तब्बल ८१७ विवाहितांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यातील ९० टक्के तक्रारी या महिलांकडून आलेल्या आहेत.

कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तोच दुसरी लाट आली. लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या. कामधंदा नसल्याने २४ तास घरात बसण्याची वेळ आली. आर्थिक अडचणीतून वाढलेली चिडचिड, संकटकाळात एकमेकांना समजून न घेणे यामुळे अनेक कुटुंबात वाद उद‌्भवले. पतीकडून पत्नीला मारहाण, मानसिक छळ, पत्नीच्या वाढलेल्या अपेक्षा अशा एक ना अनेक कारणातून दुरावा निर्माण होऊन आता ‘एकत्र राहायचेच नाही’ या मानसिकतेतून लॉकडाऊन काळातही भरोसासेलकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

.......

१८६ जोडप्यांचा संसार सुरळीत

लॉकडाऊन काळात तक्रारी दाखल झाल्यानंतर भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांच्यासह सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, हेडकॉन्स्टेबल उमेश इंगवले व इतर कर्मचाऱ्यांनी तक्रारदार महिलेसह तिच्या पतीचे व नातेवाइकांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटविले. अशा १८६ जोडप्यांचा संसार पुन्हा नव्याने फुलला आहे. तक्रारीची पडताळणी करून ११२ प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली, तर २३ पीडित महिलांना संरक्षण अधिकाऱ्याची मदत देण्यात आली आहे.

.........

कोरोना से नही साथ रहेनेसे डर लगता है

कोरोनाची भीती वाटत नाही. कोरोना झाला तरी उपचार घेऊन बरे होता येते. मात्र एकत्र राहत असल्याने आमच्यात शुल्लक कारणातून वाद होत आहेत. असे तक्रारदार महिलांचे म्हणणे आहे. पती वेळ देत नाही, मोबाइलवर जास्त बोलतो. पती त्याच्या मैत्रिणींना फोन करतो, घरात पैसे नाहीत, संसार करायचा कसा, सासू-सासरे समजून घेत नाहीत. अशा स्वरूपांच्या तक्रारी आहेत.

........

काय सांगते आकडेवारी

जानेवारी ते मे (२०२१)

८१७ तक्रारी दाखल

४०९ तक्रारींची निर्गती

४०८ तक्रारी प्रलंबित

.......

जानेवारी ते मे (२०२०)

४५० तक्रार दाखल

सर्व तक्रारींची निर्गती

........

कुठल्याही संकटकाळात पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले तर वाद निर्माण होत नाहीत. संसार दोघांचाही आहे, असा विचार करून अडचणीतून मार्ग काढावा. मागील पाच महिन्यात दाखल झालेल्या तक्रारींवर काम करत जास्तीत जास्त वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. काही महिलांना पुढील कायदेशीर मदत देण्यात आली. जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळातील बंदोबस्त सांभाळून भरोसा सेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित कामही केले. एकही दिवस हे कार्यालय बंद नव्हते. त्यामुळे जास्तीत जास्त तक्रारी निकाली निघाल्या.

- पल्लवी उंबरहंडे, उपनिरीक्षक भरोसा सेल

.........

समुपदेशन प्रभावी मार्ग

बहुतांशी पती-पत्नीमध्ये अगदी शुल्लक कारणावरून वाद उद‌्भवतात. पुढे होणाऱ्या परिणामांची त्यांना जाणीव नसते. अशा परिस्थितीत दोघांचेही समुपदेशन केल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन होऊन ते पुन्हा एकत्र येतात. काही प्रकरणांमध्ये महिलांना पुढील कायदेशीर मदत दिली जाते. तसेच तक्रारदार महिलेवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे भरोसा सेलमधील समुपदेशक तथा हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ व हेड कॉन्स्टेबल उमेश इंगवले यांनी सांगितले.