शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

स्कॉलेजिअन्स : ब्राम्हणगावचा सुपुत्र झाला पोलीस उपनिरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:36 IST

स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वप्नांचा बाजार, न संपणारी शर्यत, प्रचंड अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटीने अडचणींची पाऊलवाट तुडवायची असते.

रोहित टेकेकोपरगाव :स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वप्नांचा बाजार, न संपणारी शर्यत, प्रचंड अभ्यास, मेहनत, जिद्द, चिकाटीने अडचणींची पाऊलवाट तुडवायची असते. त्यातून आपल्या भविष्याची हवी ती स्वप्ने निवडायची असतात. असेच काहीसे कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावच्या नंदकिशोर लक्ष्मण वाबळे व निलेश भास्करराव गंगावणे या दोन मित्रांनी आपल्या परिवारासह स्थानिक शाळेचे, गावाचे आणि तालुक्याचे जिल्ह्यात नावलौकिक देऊन युवा पिढीसमोर एक आदर्श उभा केला आहे.कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील शिक्षक लक्ष्मण वाबळे व आशाताई या दाम्पत्याच्या घरी १५ डिसेंबर १९९० साली नंदकिशोर यांचा जन्म झाला. नंदकिशोरचे सर्वसाधारण सुशिक्षित कुटुंब आहे. वडील लक्ष्मण वाबळे हे सेवानिवृत्त शिक्षक. आई लताताई गृहिणी तर आहेच परंतु एक प्रगतशील महिला शेतकरी देखील आहेत. लहान भाऊ पंकज व बहीण ऋतुजा हे दोघे शिक्षण घेत आहेत. नंदकिशोरचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर जगदंबा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात २००६ साली दहावीला ८१ टक्के गुण घेत उतीर्ण झाला. पुढील अकरावी-बारावीचे शिक्षण नाशिक येथील एका महाविद्यालयात घेतले. २००८ बारावीला ७९ टक्के गुण मिळवून लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी विद्यालयातून २०१२ साली अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि खऱ्या अर्थाने वास्तविक जीवन प्रवासाला सुरवात झाली.नंदकिशोरने पदवी प्राप्त केल्यानंतर २०१२ ते २०१४ ही दोन वर्षे नाशिक येथील एका खासगी नामांकित कंपनीत नोकरी केली. परंतु तेथेही त्याची घुसमट होऊ लागली. कारणही तसेच होते. त्यावेळी त्याचा महाविद्यालयीन काळातील एक मित्र भेटला तेव्हा तो स्पर्धा परीक्षेतून केंद्रीय स्तरावरचा अधिकारी बनला होता. हे बघून नंदकिशोर हा खूप प्रभावित झाला. नोकरीसाठी बसने जाण्यासाठी निघाला आणि रस्त्यावर उभा असताना त्याला एका भरधाव डंपरने कट मारला. त्या डंपरच्या मागे लिहिले होते ‘तू पुढे जा देव तुझ्या पाठीशी आहे.’ या नोकरीविषयी होत असलेली घुसमट त्यातून या एका वाक्याच्या मिळालेल्या प्रेरणेने नंदकिशोरने त्याच दिवशी २२ हजार रुपये महिन्याच्या नोकरीचा राजीनामा देऊन २०१४ साली आपल्या घरी येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे ठरविले. त्यानुसार नंदकिशोरने २०१४ साली लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पहिला प्रयत्न केला. त्यात अपयश आले. २०१५ साल हे जाहिरातच न निघाल्याने वाया गेले. पुन्हा २०१६ साली देखील निसटते यश पदरात पडले परंतु सातत्य ठेऊन २०१७ ची संधी काही केल्या हातून जाऊ द्यायची नाही हा मनाशी पक्का निर्धार केला आणि मग काय दिवस-रात्र मेहनत करून २०१७ ला मुख्य परीक्षेत २०० पैकी १२६ गुण आणि शारीरिक १०० पैकी ९१ गुण मिळवून पठ्ठ्या नंदकिशोर हा पोलीस उपनिरीक्षक झालाच.‘‘खरे तर मला बालवयापासूनच अभिनयाची फारच आवड होती. परंतु महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यावेळी आपल्या नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या कामाची पद्धत पाहून मी खूप प्रभावित झालो. त्यांनाच आपला आयडॉल मानू लागलो. या सर्वात महत्वाचे म्हणजे आजवरच्या प्रवासात माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले.’’ - नंदकिशोर वाबळे

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव