शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सायन्स कटआॅफ ९५ टक्क्यांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:39 IST

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी गुणवंतांना चांगलेच झुंजावे लागणार आहे. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया व रेसिडेन्सिअलचा खुल्या वर्गातून विज्ञान शाखेचा कट आॅफ ९५ टक्क्यांचा आहे. दि. १४ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. दि. १८पर्यंत अर्ज स्वीकृती झाल्यानंतर २१ जूनला सर्व विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. २२ व २३ असे दोन दिवस या यादीवर विद्यार्थ्यांना असलेले आक्षेप स्वीकारण्यात आले. अर्ज भरूनही यादीत नाव नसणे, आरक्षण बदलणे, गुणात बदल अशा अनेक आक्षेपांची दुरूस्ती झाल्यानंतर २४ जून रोजी सकाळी सर्व महाविद्यालयांनी आरक्षणासह पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. यात विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली असून, प्रमुख महाविद्यालयांचे कट आॅफ ९५च्या पुढे गेले आहेत. वाणिज्यची गुणवत्ता यादी ७५ ते ९०च्या आसपास आहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे जागा रिक्त राहू नये म्हणून कला शाखेला खुला प्रवेश देण्यात येत आहे. परिणामी या शाखेची गुणवत्तायादीच प्रसिद्ध झालेली नाही. जो येईल त्याला प्रवेश असे सर्वच महाविद्यालयांचे धोरण आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शनिवारपासून (दि. २५ ते २७) सुरू होत आहेत. यानंतरही जागा रिक्त राहिल्या तर दि. २८ जूनला पहिली, दि. १ जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी लावण्यात येईल. दि. ९ ते १३ जुलैदरम्यान विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश होणार आहेत. सर्व प्रक्रिया संपल्यानंतर १४ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)