शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सायन्स कटआॅफ ९५ टक्क्यांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:39 IST

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी गुणवंतांना चांगलेच झुंजावे लागणार आहे. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया व रेसिडेन्सिअलचा खुल्या वर्गातून विज्ञान शाखेचा कट आॅफ ९५ टक्क्यांचा आहे. दि. १४ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. दि. १८पर्यंत अर्ज स्वीकृती झाल्यानंतर २१ जूनला सर्व विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. २२ व २३ असे दोन दिवस या यादीवर विद्यार्थ्यांना असलेले आक्षेप स्वीकारण्यात आले. अर्ज भरूनही यादीत नाव नसणे, आरक्षण बदलणे, गुणात बदल अशा अनेक आक्षेपांची दुरूस्ती झाल्यानंतर २४ जून रोजी सकाळी सर्व महाविद्यालयांनी आरक्षणासह पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. यात विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली असून, प्रमुख महाविद्यालयांचे कट आॅफ ९५च्या पुढे गेले आहेत. वाणिज्यची गुणवत्ता यादी ७५ ते ९०च्या आसपास आहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे जागा रिक्त राहू नये म्हणून कला शाखेला खुला प्रवेश देण्यात येत आहे. परिणामी या शाखेची गुणवत्तायादीच प्रसिद्ध झालेली नाही. जो येईल त्याला प्रवेश असे सर्वच महाविद्यालयांचे धोरण आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शनिवारपासून (दि. २५ ते २७) सुरू होत आहेत. यानंतरही जागा रिक्त राहिल्या तर दि. २८ जूनला पहिली, दि. १ जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी लावण्यात येईल. दि. ९ ते १३ जुलैदरम्यान विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश होणार आहेत. सर्व प्रक्रिया संपल्यानंतर १४ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)