शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

सायन्स कटआॅफ ९५ टक्क्यांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2016 00:39 IST

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात

अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदाचा दहावीचा निकाल घसरला असला, तरी विज्ञान, वाणिज्य शाखेचे कटआॅफ ९० टक्क्यांच्या पुढेच असल्याने पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी गुणवंतांना चांगलेच झुंजावे लागणार आहे. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया व रेसिडेन्सिअलचा खुल्या वर्गातून विज्ञान शाखेचा कट आॅफ ९५ टक्क्यांचा आहे. दि. १४ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. दि. १८पर्यंत अर्ज स्वीकृती झाल्यानंतर २१ जूनला सर्व विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. २२ व २३ असे दोन दिवस या यादीवर विद्यार्थ्यांना असलेले आक्षेप स्वीकारण्यात आले. अर्ज भरूनही यादीत नाव नसणे, आरक्षण बदलणे, गुणात बदल अशा अनेक आक्षेपांची दुरूस्ती झाल्यानंतर २४ जून रोजी सकाळी सर्व महाविद्यालयांनी आरक्षणासह पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. यात विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली असून, प्रमुख महाविद्यालयांचे कट आॅफ ९५च्या पुढे गेले आहेत. वाणिज्यची गुणवत्ता यादी ७५ ते ९०च्या आसपास आहे. कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे जागा रिक्त राहू नये म्हणून कला शाखेला खुला प्रवेश देण्यात येत आहे. परिणामी या शाखेची गुणवत्तायादीच प्रसिद्ध झालेली नाही. जो येईल त्याला प्रवेश असे सर्वच महाविद्यालयांचे धोरण आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शनिवारपासून (दि. २५ ते २७) सुरू होत आहेत. यानंतरही जागा रिक्त राहिल्या तर दि. २८ जूनला पहिली, दि. १ जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी लावण्यात येईल. दि. ९ ते १३ जुलैदरम्यान विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश होणार आहेत. सर्व प्रक्रिया संपल्यानंतर १४ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)