शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

शाळकरी मुले हातपंपावर!

By admin | Updated: July 2, 2014 01:00 IST

अहमदनगर : शहरात सलग तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने शाळकरी मुलांना हातपंपाचा (हापसा) आधार घ्यावा लागला.

अहमदनगर : शहरात सलग तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने शाळकरी मुलांना हातपंपाचा (हापसा) आधार घ्यावा लागला. हातपंपावरून पाणी भरून मुलांनी शाळेची तयारी केली. नोकरदारांनाही पाणी बंद असल्याचा फटका बसला. महिलाही पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे चित्र रविवारी, सोमवारी शहरात दिसून आले. शहरात पाणी टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पाणी कपातीचा विचार सुरू आहे. एकीकडे हा विचार सुरू असला तरी गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांकडे मात्र सगळ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. मुळा धरणातून सुपा एमआयडीसीतील पाईपलाईन जाते. या पाईपलाईनवर चासजवळ एक इंची कनेक्शन बेकायदा काढण्यात आले आहे. चोवीस तास त्यातून पाणी सुरू असते. त्याचा वापर धोबीघाटासारखा केला जात आहे. शहरातील पत्रकार चौकातही महापालिकेची पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली आहे. महिन्यापासून फुटलेल्या या लाईनमधून रोज लाखो लिटर पाणी गटारात जात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य शहरात असल्याने महिला, शालेय मुलांची तारांबळ उडत आहे. डोक्यावर पाण्याचे हंडे घेत महिला जीव धोक्यात घालून नगर-पुणे महामार्ग ओलांडतानाचे चित्र रविवारी दिसून आले. श्रमिकनगर येथे शालेय मुले हातपंपाचे पाणी घेऊन जात होते. पत्रकार चौकात फुटलेल्या पाईपलाईनवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळाले.