लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील प्राथमिक शाळेची इमारत बुधवारी मध्यरात्री कोसळली. शाळेची इमारत रात्री पडल्यामुळे निंबोडींची पुनरावृत्ती टळली. यामुळे संतप्त घारगावकरांनी गाव बंद ठेवून नगर-दौंड राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, सभापती पुरुषोत्तम लगड, माजी जि. प. सदस्य दिनकर पंधरकर, पं. स. सदस्य शहाजी हिरवे, बापू शिंदे, सरपंच सुनीता कुचेकर, नितीन नलगे, भुषण बडवे तसेच मोठ्या विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
घारगाव येथील सत्तर वषार्पुर्वी धर्मशाळेच्या इमारतीत शाळा भरते. एकूण वर्ग १७ आहेत. आता १७८ विद्यार्थी असून सध्या ९ खोल्यांची गरज आहे. घारगावकरांनी शाळा इमारत व्हावी म्हणून दहा वषार्पासून पाठपुरावा केला आहे पण जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही. त्यामुळे आता शाळा खोल्यांना मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही असा पवित्रा घेतला आहे. यावेळी निंबोडी येथील दुदैर्वी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली