शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

एटीएममध्ये पैशांचा तुटवडा

By admin | Updated: May 10, 2017 13:36 IST

शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध होत असून एटीएम मशिनमध्ये मात्र पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ १० - शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध होत असून एटीएम मशिनमध्ये मात्र पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातही एटीएम मशिनमधून पैसे येत नसल्याने ग्राहकांची पैशांसाठी भटकंती सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून चलन पुरवठा झाला नसल्याने एटीएम मशिनमध्ये पैसे उपलब्ध नसल्याचे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. नगर शहरातील सर्वच बँकांमध्ये ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम उपलब्ध करून दिली जात आहे. बँकामध्ये पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी काही एटीएममध्येही पुरेसे पैसे उपलब्ध होते, मात्र पाहिजे तेवढी रक्कम काढता येत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.ग्रामीण भागात मात्र ग्राहकांची निराशा आहे. राहाता शहरात पाच ते सहा एटीएम आहेत. मात्र कोणत्याच मशिनमधून पैसे मिळत नाहीत. मशिनमध्ये फक्त पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्याने शंभराच्या पटीत पैसे काढणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. विशिष्ट वेळीच मशिनमधून पैसे काढता येत असल्याची स्थिती आहे.पारनेर तालुक्यातील पळवे या गावातील ग्राहकांना महामार्गावरील सुपा येथील एटीएममधून पैसे काढण्यासाठी यावे लागते. मात्र एटीएममध्ये खडखडाट असल्याने ग्राहकांना चकरा माराव्या लागत असून ग्राहकांना ताटकळत बसावे लागते आहे. निघोज (ता. पारनेर) या गजबजलेल्या गावातील तिन्ही एटीएमवर ग्राहकांच्या रांगा होत्या. मंगळवारी एटीएममध्ये पैसे नव्हते. नोटाबंदीनंतर एटीएम बंदी झाल्याची ग्राहकांमध्ये चर्चा होती. शनिशिंगणापूरमध्ये मात्र ग्राहकांना पैसे उपलब्ध होत आहेत. तेथे बँकेपेक्षा एटीएमवरच ग्राहकांची जास्त गर्दी होती. भेंडा (ता. नेवासा) येथे एटीएममध्ये खडखडाट होता, मात्र बँकांमध्ये पैसे मिळत आहेत. जिल्हा बँकेचे एटीएम धुळखात पडून असल्याने ग्राहकांना बँकांमध्येच रांगा लावाव्या लागत आहेत.एटीएम मशिनमध्ये पैसे उपलब्ध नसल्याच्या दोन ते तीन दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी आहेत. कोणत्याही महिन्याच्या १ ते १० या तारखेदरम्यान बँकांवर ताण असतो. बॅकांमध्ये चलन पुरवठा उपलब्ध असेल त्या पद्धतीने एटीएम मध्ये पैसे उपलब्ध करून दिले. कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढावे, यासाठी रिझर्व्ह बँकेकडून चलन पुरवठा झाला नाही. मार्केटमध्ये पुरवठा केलेला पैसा परत येत नाही. लोकांचा भर कॅशलेस पेक्षा रोख व्यवहारांवर आहे. त्यामुळे आरबीआयने चलनाचा कृत्रीम तुडवडा केल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.