शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

हे तर ‘भाजप बचाओ’ आंदोलन- बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:52 IST

संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. 

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यात भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन’ हे भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून काम करत आहेत. या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. संगमनेर येथील संपर्क कार्यालयातून दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही. सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही हीच भूमिका मांडली होती. पण त्यांची कृती मात्र, या भूमिकेच्या विरोधात आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला मदत केली आहे. खरंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीशी भांडायला हवे होते. त्यांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी मदत पॅकेज मंजूर करून घेतले असते, तर आम्हाला त्याचे कौतुक वाटले असते. पण फडणवीस आणि त्यांच्या सहकाºयांना महाराष्ट्र सरकारबरोबर बोलायचे नाही. त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत. आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करू. त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे. संकटातून मार्ग काढण्यापेक्षाही सरकार अडचणीत कसे येईल, यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. खरं तर फडणवीसांची निष्ठा महाराष्ट्रासोबत नाही. ती दिल्लीतल्या भाजपा नेत्यांसोबत आहे. महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणीव आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. अशावेळी भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल, असे थोरात यांनी म्हटले आहे.