शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हे तर ‘भाजप बचाओ’ आंदोलन- बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:52 IST

संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. 

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यात भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन’ हे भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून काम करत आहेत. या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही. त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फार्स केला जात आहे. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्र द्रोहच म्हणावे लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकान्वये केली आहे. संगमनेर येथील संपर्क कार्यालयातून दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही. सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही हीच भूमिका मांडली होती. पण त्यांची कृती मात्र, या भूमिकेच्या विरोधात आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला मदत केली आहे. खरंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीशी भांडायला हवे होते. त्यांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी मदत पॅकेज मंजूर करून घेतले असते, तर आम्हाला त्याचे कौतुक वाटले असते. पण फडणवीस आणि त्यांच्या सहकाºयांना महाराष्ट्र सरकारबरोबर बोलायचे नाही. त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत. आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करू. त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे. संकटातून मार्ग काढण्यापेक्षाही सरकार अडचणीत कसे येईल, यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. खरं तर फडणवीसांची निष्ठा महाराष्ट्रासोबत नाही. ती दिल्लीतल्या भाजपा नेत्यांसोबत आहे. महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणीव आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. अशावेळी भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल, असे थोरात यांनी म्हटले आहे.