शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

शेती वाचवा, लोकशाही वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST

अहमदनगर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करावे व इतर लोकशाही ...

अहमदनगर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, कामगार विरोधी लेबर कोड रद्द करावे व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करावे, अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. शेती वाचवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठविण्यात आले.

या आंदोलनात अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. बापूराव राशीनकर, अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे, बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, आप्पासाहेब वाबळे, कॉ. संजय नांगरे, दीपक शिरसाठ, बाबासाहेब सोनपुरे, महादेव पालवे, कार्तिक पासळकर, नामदेव ससे, बाबासाहेब सागडे, संतोष पुंड, कारभारी गायकवाड, वैभव कदम, तुळशीराम अंगते, लक्ष्मण जाधव, सरुदास सातपुते, संजय ससे, अशोक झिरपे आदी सहभागी झाले होते.

केंद्रातील भाजप सरकारने शेतकरीविरोधी तीन कायदे केले. हे कायदे बनवण्याआधी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. संसदीय समितीमार्फत छाननी करण्यात आलेली नाही. राज्यसभेत मतदान ही घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. २६ जूनला किसान मोर्चाला सात महिने पूर्ण होत आहेत. दिल्ली येथील किसान आंदोलन दडपण्यासाठी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यावर दगड टाकून, खड्डे करून, खिळे पेरून, अश्रूधूर सोडून व पाण्याचे फवारे मारून शेतकऱ्यांवर हल्ले केले. त्यांच्यावर खोटे खटले भरून त्यांना जेलमध्ये टाकले. शेतकऱ्यांसह कामगार, आंदोलक, युवक, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्याक, दलित व आदिवासी समाज यांच्यावर दडपशाही केली जात आहे. देशात लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

किसान विरोधी कायदे रद्द करावे, एमएसपीची कायदेशीर हमी द्यावी, खासगीकरणाचे धोरण मागे घ्यावे, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट तात्काळ रद्द करावा, डिझेल, पेट्रोलची भाववाढ रद्द करून महागाईला आळा घालावा, शेती अवजारे, बी-बियाणे, औषधे जीएसटी करमुक्त करावे, प्रस्तावित वीज विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

..................

२६ किसान सभा आंदोलन

शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने कण्यात आली. (छाया-वाजिद शेख-नगर)