शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

शिरसाटवाडी येथे ग्रामस्थांचा पाच तास बैठा सत्याग्रह

By | Updated: December 8, 2020 04:17 IST

पाथर्डी/माणिकदौंडी : तालुक्यातील शिरसाटवाडी परिसरामध्ये दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे. एकाच वेळेला अनेक भागांत बिबट्या पाहिले गेले असून, त्याचा ...

पाथर्डी/माणिकदौंडी : तालुक्यातील शिरसाटवाडी परिसरामध्ये दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे. एकाच वेळेला अनेक भागांत बिबट्या पाहिले गेले असून, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मनसे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी सोमवारी सकाळी शिरसाटवाडी येथे बैठा सत्याग्रह केला.

येथे नायब तहसीलदार पंकज नेवसे, तलाठी हरी सानप, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे, वनपाल आल्हाट यांनी अविनाश पालवे यांना आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र, पालवे यांनी जोपर्यंत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून शिरसाटवाडी परिसरात पाच पिंजरे कधी लावाल ते सांगा, त्याशिवाय उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

अविनाश पालवे म्हणाले, आतापर्यंत तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात तीन मृत्यू झाले आहेत. आमच्या गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू व्हायची वन विभाग वाट पाहत आहे काय? माझ्या एका जरी माणसाचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेला तर वनविभागाच्या एकाही अधिकाऱ्याला सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर नायब तहसीलदार नेवसे यांनी निरभवणे यांना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ बोलण्यास सांगितले.

यावेळी नंदू शिरसाट, नारायण शिरसाट, मुरली पाटील शिरसाट, पोपट पालवे, तुषार शिरसाट, अंबादास शिरसाट, अंकुश शिरसाट, अशोक फुंदे, अनंता कराड, पप्पू सानप, बाबू शिरसाट, आजिनाथ सानप, बबलू शिरसाट, अशोक शिरसाट, विनोद शिरसाट, नामदेव खाडे, ज्ञानेश्वर कराड, नीलेश शिरसाट, शरद शिरसाट, रोहिदास शिरसाट, योगेश शिरसाट आदी उपस्थित होते.

चाैकट...

आठ दिवसांत पाच पिंजरे..

निरभवणे यांनी जिल्हा वनसंरक्षक आदर्श रेड्डी व सहायक वनसंरक्षक सुनील पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी येत्या आठ दिवसांत पाच पिंजरे लावू व वनरक्षक आपल्या भागात गस्त घालतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर बैठा सत्याग्रह तूर्तास स्थगित करीत असल्याचे जाहीर करण्यात आले.

फोटो : ०७ शिरसाटवाडी

शिरसाटवाडी येथे ग्रामस्थांनी वनविभागाला विविध मागण्यांचे निवेदन दिले. (छायाचित्र : संदीप शेवाळे)