शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सराला बेटला ‘हेरिटेज’चा दर्जा

By admin | Updated: August 9, 2014 00:20 IST

सराला बेटला ‘हेरिटेज’चा दर्जा

संगमनेर : अध्यात्मामुळे भारत हा संस्कृतीप्रधान देश म्हणून जगात अव्वल क्रमांकावर आहे. मनुष्याच्या जीवनाचा अर्थ अध्यात्मात आहे. समाज सुस्थितीत ठेवण्याकरिता भक्तीशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. शुक्रवारी नाईक यांनी तळेगाव दिघे येथे सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सांगता समारंभप्रसंगी सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनास हजेरी लावली. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार आर. एम. वाणी,आमदार अशोक काळे आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, मनुष्य जीवनातील चिंता व नैराश्य अध्यात्माच्या माध्यमातून दूर होतात. बाह्यविकासासाठी आंतरीक विकास होणे गरजेचे आहे. या सप्ताहाला थोर परंपरा आहे. प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची शक्ती वारकरी संप्रदाय देतो. आपण त्याचे पाईक असून हा वारसा पुढे न्यायचा आहे. म्हणून अध्यात्माचा भक्त या नात्याने सप्ताहास उपस्थित राहिल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले. भुजबळ यांनी राज्यात पर्यटन विकासावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्याचे सांगून केवळ दु:खातच देवाचा धावा न करता सुखातही देव, साधू-संतांचे नामस्मरण करायला हवे, असे सांगितले. थोरात यांनी सप्ताह हा मानव धर्माचे व्यासपीठ आहे. रामगिरी महाराजांच्या निमित्ताने मठाला आदर्श वारसा मिळाला असून तो महाराजांनी देशभर घेवून जाण्याची सूचना केली. लोखंडे, सुरेश चव्हाणके व तांबे यांनी मनोगत व्यक्त केले. सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरीनामाच्या जयघोषात सप्ताहाची सांगता झाली. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, जिल्हा बँक अध्यक्ष बाजीराव खेमनर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)