शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले!

By admin | Updated: June 27, 2016 01:00 IST

हिवरेबाजार : कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’ सारखे चित्रपट काढतात. त्यामुळे तरूण पिढी बरबाद होते.

हिवरेबाजार : कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’ सारखे चित्रपट काढतात. त्यामुळे तरूण पिढी बरबाद होते. ‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले. स्वत:च्या पायावर उभे राहा, शिक्षण पूर्ण करा, मग सैराट व्हा, असा सल्ला जलसंधारण तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे तरुणांना दिला.नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडले आहेत. मराठी रसिकांना या चित्रपटाने वेड लावले आहे. एवढेच नव्हे तर मराठीतील या लोकप्रिय चित्रपटाचा आता तेलगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिमेक होणार आहे. तेलगु चित्रपट स्वत: नागराज दिग्दर्शित करणार असल्याचे समजते. शिवतारे यांनी मात्र अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी बरबाद होते, अशी भीती व्यक्त केली आहे. तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे त्यांनी हिवरेबाजार (ता. नगर) येथील जलसंधारण व विकास कामांची पाहणी केल्यानंतर सांगितले. देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर गावे सुधारली पाहिजे. ग्रामीण भागासाठी सरकारी योजना भरपूर आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांचे संघटन व एकोपा महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. पोपटराव पवार यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व गावाला लाभले. निवडणूक बिनविरोध झाली तर गावाचा आपोआप विकास होईल. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवतारे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपणही करण्यात आले. रविवारची सुट्टी असूनही येथील आरोग्य उपकेंद्र चालू असल्याचे पाहून त्यांनी येथील कर्मचारी ज्योती तोडमल यांचे कौतुक केले. सुट्टीच्या दिवशी उपकेंद्र चालू ठेवणारे हे राज्यात एकमेव गाव आहे.(वार्ताहर)कर्जत : मी नियोजनबद्ध विकास कामे हाती घेतली आहेत. मला विकास कामांचं याड लागलंय, त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले.कर्जत येथे रोटरी क्लबच्या सहकार्यातून उभारलेल्या समर्थसागर तलावातील पाण्याचे पूजन रविवारी शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून कर्जतच्या दोन्ही बाजूस भरीव काम झाले. यामध्ये पावसाचे पाणी साठले. याबद्दल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील २१ गावे या योजनेत आहेत. त्यांचा नऊ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार झाला आहे. कर्जतसाठी निधीची भरीव तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी दिली. समर्थसागरचे दिशादर्शक काम झाले आहे. या कामासाठी सामाजिक संस्थांप्रमाणेच इतरांनीही पुढे येऊन लोकचळवळ निर्माण व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, रोटरीचे अध्यक्ष संदीप काळदाते, प्रांत अधिकारी रवींद्र ठाकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची भाषणे झाली. उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, सभापती श्रीधर पवार, पणनचे संचालक प्रसाद ढोकरीकर, भाजपाचे शहराध्यक्ष रामदास हजारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)