शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले!

By admin | Updated: June 27, 2016 01:00 IST

हिवरेबाजार : कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’ सारखे चित्रपट काढतात. त्यामुळे तरूण पिढी बरबाद होते.

हिवरेबाजार : कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’ सारखे चित्रपट काढतात. त्यामुळे तरूण पिढी बरबाद होते. ‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले. स्वत:च्या पायावर उभे राहा, शिक्षण पूर्ण करा, मग सैराट व्हा, असा सल्ला जलसंधारण तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे तरुणांना दिला.नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडले आहेत. मराठी रसिकांना या चित्रपटाने वेड लावले आहे. एवढेच नव्हे तर मराठीतील या लोकप्रिय चित्रपटाचा आता तेलगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिमेक होणार आहे. तेलगु चित्रपट स्वत: नागराज दिग्दर्शित करणार असल्याचे समजते. शिवतारे यांनी मात्र अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी बरबाद होते, अशी भीती व्यक्त केली आहे. तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे त्यांनी हिवरेबाजार (ता. नगर) येथील जलसंधारण व विकास कामांची पाहणी केल्यानंतर सांगितले. देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर गावे सुधारली पाहिजे. ग्रामीण भागासाठी सरकारी योजना भरपूर आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांचे संघटन व एकोपा महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. पोपटराव पवार यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व गावाला लाभले. निवडणूक बिनविरोध झाली तर गावाचा आपोआप विकास होईल. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवतारे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपणही करण्यात आले. रविवारची सुट्टी असूनही येथील आरोग्य उपकेंद्र चालू असल्याचे पाहून त्यांनी येथील कर्मचारी ज्योती तोडमल यांचे कौतुक केले. सुट्टीच्या दिवशी उपकेंद्र चालू ठेवणारे हे राज्यात एकमेव गाव आहे.(वार्ताहर)कर्जत : मी नियोजनबद्ध विकास कामे हाती घेतली आहेत. मला विकास कामांचं याड लागलंय, त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले.कर्जत येथे रोटरी क्लबच्या सहकार्यातून उभारलेल्या समर्थसागर तलावातील पाण्याचे पूजन रविवारी शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून कर्जतच्या दोन्ही बाजूस भरीव काम झाले. यामध्ये पावसाचे पाणी साठले. याबद्दल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील २१ गावे या योजनेत आहेत. त्यांचा नऊ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार झाला आहे. कर्जतसाठी निधीची भरीव तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी दिली. समर्थसागरचे दिशादर्शक काम झाले आहे. या कामासाठी सामाजिक संस्थांप्रमाणेच इतरांनीही पुढे येऊन लोकचळवळ निर्माण व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, रोटरीचे अध्यक्ष संदीप काळदाते, प्रांत अधिकारी रवींद्र ठाकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची भाषणे झाली. उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, सभापती श्रीधर पवार, पणनचे संचालक प्रसाद ढोकरीकर, भाजपाचे शहराध्यक्ष रामदास हजारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)