शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संगमनेरचा पठारभाग सौम्य भूकंपप्रवण रेषेवर : ‘मेरी’चा दावा

By सुधीर लंके | Updated: August 26, 2018 12:52 IST

संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सुधीर लंकेअहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे धक्के हानीकारक नसल्याने नागरिकांनी घाबरु नये, असेही आवाहन या संस्थेने केले आहे.संगमनेर तालुक्यात पुण्याकडे जाताना नाशिक-पुणे महामार्गालगत डोंगराळ परिसर आहे. त्याला पठार भाग म्हणून ओळखले जाते. या भागात गत दहा दिवसात घारगाव, बोरबन, कोठे, माळेगाव पठार, आंबीखालसा, नांदूर खंदरमाळ या परिसरात जमिनीतून तीनदा मोठा आवाज होऊन नागरिकांना कंप जाणवला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता नांदूर येथे एका घराला तडे गेले आहेत. ‘लोकमत’ टीमने आज या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.गत दोन-तीन वर्षांपासून या परिसरात असे धक्के जाणवत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गत आठवड्यातील दोन धक्के रात्री तर एक सकाळी जाणवला. यातील दोन धक्क्यांची ‘मेरी’या संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर २.८ व २.५ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे. हे भूकंपाचे धक्के असल्याचे ‘मेरी’च्या शास्त्रज्ञ चारुलता चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक नागरिकांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रात्री धक्का बसल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर पळत सुटले, अशी माहिती घारगावचे माजी उपसरपंच संदीप आहेर यांनी ‘लोकमत’ला दिली. नागरिक भयभीत असल्याने नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, प्रशासनाकडून प्रभावी दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांनी जुन्या व मोडकळीस आलेल्या घरात राहू नये, अशा केवळ नोटिसा प्रशासनाने पाठविल्या असल्याचे खंदरमाळवाडीचे उपसरपंच प्रमोद लेंडे यांनी सांगितले. हा भूकंपच आहे की आणखी काही याबाबतही नागरिक संभ्रमात दिसले.प्रशासनाचे दुर्लक्षशुक्रवारी रात्री नांदूर येथील सुभाष सुपेकर यांच्या घराला तडा गेला आहे. प्रशासनाला कळविल्यानंतरही शनिवारी दिवसभर कुणीही याबाबत पंचनामा करण्यासाठी आलेले नव्हते. साधे तलाठीही फिरकले नाहीत, अशी खंत या कुटुंबातील महिला अर्चना सुपेकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केली. या घरात वीट बांधकाम असलेल्या सिमेंटच्या भिंतीला आरपार तडा गेला आहे. इतरही काही छोट्या भेगा पडल्या आहेत.डहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषाडहाणू ते गुजरात अशी भूकंपाची भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे. या रेषेवर येणारी गावे ही सौम्य भूकंपप्रवण प्रदेशात मोडतात. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसर या रेषेवर येत असल्याने हे धक्के जाणवत आहेत. हे भूकंपाचे धक्के आहेत. मात्र, हा अत्यंत सौम्य भूकंप आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. असे धक्के काही दिवस जाणवतात व नंतर बंदही होतात. बऱ्याचदा जमिनीतील ऊर्जा बाहेर पडण्यासाठी असे धक्के मदतही करतात. त्यामुळे एकदम मोठा भूकंप होण्याची शक्यता टळते. या परिसरात १९९५, १९९८, २०११, २०१७ मध्येही असे धक्के जाणवलेले आहेत. - चारुलता चौधरी, वैज्ञानिक अधिकारी, मेरी, नाशिक.‘मेरी’ची टीम आज घारगावमध्ये‘मेरी’ (महाराष्टÑ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक) ही संस्था भूकंपाबाबत अभ्यास करणारी नोडल एजन्सी आहे. या संस्थेचे पथक शनिवारी घारगाव परिसराची पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही ‘लोकमत’ला ही माहिती दिली. आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यायची, याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना प्रात्यक्षिक दिले जाणार असल्याचेही द्विवेदी म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर