शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात आता परराज्यातून वाळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:21 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने गौण खनिज विभागाने १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी ई-निविदेची तिसरी फेरी ...

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने गौण खनिज विभागाने १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी ई-निविदेची तिसरी फेरी जाहीर केली आहे. दरम्यान जिल्ह्यात आता परराज्यातून वाळू येऊ लागली आहे. परराज्यातून येणाऱ्या वाळू वाहतुकीबाबत राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील १८ वाळू घाटांचे लिलाव करण्यास राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. त्यापैकी तीन वाळू साठे शासकीय कामासाठी राखीव ठेवण्यात आले होते, तर लिलावाच्या पहिल्या फेरीत संगमनेर तालुक्यातील एका वाळू साठ्याचा लिलाव झाला. राहिलेल्या १४ साठ्यांसाठी दुसरी फेरी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्येही प्रतिसाद न मिळाल्याने आता प्रशासनाने तिसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे. १० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द, नायगाव, मातुलठाण, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण, संवत्सर, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द, पिंप्री वळण, चंडकापूर, वळण, रामपूर, सात्र‌ळ, राहाता तालुक्यातील पुणतांबा, रस्तापूर येथील वाळू साठ्यांचा लिलाव होणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात वाळू साठ्यांचे लिलाव बंद आहेत. अवैध वाळू उपसा सुरू असला तरी जिल्ह्यात वाळूची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे परराज्यातून वाळूची आवक सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेता परराज्यातून येणाऱ्या वाळूसाठी शासनाने एका परिपत्रकान्वये नियमावली जाहीर केली आहे. परराज्यातून आलेल्या वाळूची महाखनिज या संगणकीय प्रणालीत नोंद करणे आवश्यक राहील. सदरची वाळू वैध मार्गाने आली का याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. थेट बांधकामाच्या ठिकाणी वाळू नेणार असल्यास वैध वाहतूक पास असणे आवश्यक राहणार आहे. परराज्यातून आणलेली वाळू विकली जाणार असेल तर त्यासाठी व्यापारी परवाना आवश्यक राहणार आहे. स्वामित्वधनाच्या १० टक्के प्रतिब्रास रक्कम गौण खनिज कार्यालयात भरणे अनिवार्य राहणार आहे. वाळूचा साठा करणार असल्यास जी जागा अकृषक असणे आवश्यक राहणार आहे.

-------------

पहिल्या फेरीत एका साठ्याचा लिलाव झाला. १४ साठ्यांसाठी लिलावाच्या दुसऱ्या फेरीतही प्रतिसाद न मिळाल्याने तिसरी फेरी जाहीर करण्यात आली आहे. सध्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. बोटीद्वारे पाणी उपसा करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे लिलाव घेण्यास ठेेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. तिसऱ्या फेरीत काय प्रतिसाद मिळतो, ते पाहणे महत्त्वाचे आहे.

-वसिम सय्यद, खनिकर्म अधिकारी, गौण खनिज विभाग

--फाईल फोटो- सँड