शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

९ व १० डिसेंबरला नगरमध्ये समरसता साहित्य संमेलन ; अध्यक्षपदी गिरीष प्रभुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:27 IST

समरसता साहित्य परिषदेच्या वतीने सावेडीतील रेणावीकर शाळेत १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ व १० डिसेंबर रोजी दोन दिवस चालणा-या संमेलनात राज्यभरातील साहित्यित सहभागी होणार आहेत.

अहमदनगर : समरसता साहित्य परिषदेच्या वतीने सावेडीतील रेणावीकर शाळेत १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ व १० डिसेंबर रोजी दोन दिवस चालणा-या संमेलनात राज्यभरातील साहित्यित सहभागी होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे तर स्वागताध्यक्ष अ‍ॅड. अशोक गांधी असल्याची माहिती सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक प्रा. रमेश पांडव यांनी दिली. भटक्या विमुक्तांचे साहित्य व समरसता विषयावर संमेलनात चर्चा व परिसंवाद होणार आहे.९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात होईल. सकाळी दहा वाजता शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. संमेलनाध्यक्ष गिरीश प्रभुणे, माजी संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांची उपस्थिती असेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता वारसा शौर्याचा, संस्कृतीचा विषयावर परिसंवाद होईल. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लीला गोविलकर असतील. या परिसंवादात स्वातंत्र्यचळवळ आणि भटके विमुक्तांचे योगदान विषयावर डॉ. चंद्रकांत पुरी सविस्तर माहिती देतील. तसेच नाथ संप्रदाय वा भटके विमुक्त विषयावर डॉ. एस. के. जोगी आणि भटके विमुक्तांच्या कला व जीवनवर डॉ. विजय राठोड यांचे विचार मांडतील. दुपारी सव्वा तीन वाजता मराठी साहित्यातील प्रतिबिंब आणि समरसता विषयावर डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडेल. यामध्ये डॉ. पुष्पा गावित, डॉ. शंकर धडके, डॉ. प्रकाश खांडगे सहभाग असेल. याशिवाय मराठी साहित्यातील भटके विमुक्तांचे चित्रण, भटक्यांची आत्मकथने, भटके विमुक्तांचे पारंपरिक अविष्कार याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात येईल. डॉ. सुवर्णा रावळ यांचे भटके विमुक्त महिलांचे जीवन व समस्या विषयावर व्याख्यान होईल. तसेच भातू समाजाच्या कार्यकर्त्या वत्सला काळे, मुस्लिम भटके विमुक्त समाजाचे कार्यकर्ते अमीन जामगावकर यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliteratureसाहित्य