शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या धान्याची लाभार्थींकडून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

अहमदनगर : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने गोरगरीब जनता उपाशी राहणार नाही, यासाठी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काहींना मोफत, तर ...

अहमदनगर : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने गोरगरीब जनता उपाशी राहणार नाही, यासाठी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काहींना मोफत, तर काहींना अल्पदरात धान्य दिले जात आहे. मात्र काही लाभार्थी त्यांच्या नावावर घेतलेले धान्य दुकानदार, व्यापारी, इतर नागरिकांना विकत आहेत. मोफत घेतलेले धान्य दहा रुपये किलो दराने विकले जात असल्याचा प्रकार जिल्ह्याच्या अनेक भागात सुरू आहे.

कोरोनाच्या काळात नागरिकांना सरकारने मोफत धान्य दिले. राज्य व केंद्राने घोषणा केल्याने लाभार्थींना दुप्पट धान्य मिळाले. अंत्योदय योजनेच्या एका लाभार्थींकडे एका महिन्याला ५० किलोच्या वर धान्य घरात येऊ लागले. मात्र मोफत धान्य घेऊन ते कसे खायचे, असाही प्रश्न अनेक लाभार्थींना असतो. त्यामुळे लागेल तेवढे धान्य ठेवून घेतात आणि इतर धान्याची बाजारात, दुकानात विक्री करतात. अंत्योदय व दारिद्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य दिले जाते. मोफत, तसेच २ रुपये व ३ रुपये किलो मिळणारे हे धान्य १० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे ‘लोकमत’च्या विविध ठिकाणच्या वार्ताहरांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

------------

अंगठा दिल्याशिवाय लाभार्थीला धान्य मिळत नाही. धान्य वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन असते. त्यामुळे दुकानात घोटाळा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. लाभार्थींनी घेतलेल्या धान्याचे काय होते, ते घरी वापरतात की विकतात, याबाबत कारवाई करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना किंवा आदेश नाहीत. या प्रकारावर पुरवठा विभाग नियंत्रणही ठेवू शकत नाही. त्यामुळे असे प्रकार आढळले तर त्यावर काय कारवाई करायची, याचे कोडेच आहे.

- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी

--------

जिल्ह्यातील रेशनकार्डधारक

जिल्ह्यातील रेशनकार्डधारक- १०,८८,३८५

बीपीएल- ६,०५,५२४

अंत्योदय- ८८,६१८

केशरी- ३,३५,६६०

--------------

मोफत धान्य कोणाला

नगर जिल्ह्यासाठी एका महिन्यात ३१ लाख ४६ हजार इतक्या लाभार्थींसाठी १५ हजार मेट्रिक टन धान्य मिळते. एका लाभार्थीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळतो. असे पाच किलो धान्य एका महिन्यासाठी मिळते. कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर २५ किलो धान्य मिळते. याशिवाय राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळत असल्याने एका कुटुंबात किमान ५० किलो धान्य प्रतिमाह मिळते. मिळालेल्या धान्यातून काही धान्य विकून ज्वारी-बाजरी घेतली जाते, असे राहाता तालुक्यातील लाभार्थींनी सांगितले.

--

डमी क्रमांक-११७५