शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

ग्राहक पाहून खतांची विक्री; केंद्र चालक उठवितात गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना जे खत पाहिजे ते मिळत नाही. नको असलेल्या कंपन्यांचीच खते जुन्या दराने शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. त्यामुळे खतांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे सांगण्यात आले.

खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची खरेदी केली जात आहे. काही भागात ऊस पिकासाठी खतांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कंपन्यांनी खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली होती. परंतु, सरकारने खतांच्या अनुदानात वाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्या दराने खते खरेदीची संधी मिळाली. खतांच्या कंपन्यांबाबत शेतकरीही जागृत आहेत. ते नामवंत कंपन्यांच्याच खतांची मागणी करतात. परंतु, कृषी सेवा केंद्र चालक शेतकरी ज्या कंपन्यांची खते मागतात, ते शिल्लक नसल्याचे सांगून जे खत नको आहे, तेच घेण्यास भाग पाडतात. त्यामुळे खतांच्या मात्रा देताना त्यात बदल करावा लागत आहे. जिल्ह्यात पुरेसे खत उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र खते उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना नको असलेल्या खतांची सर्रास विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांनाही नाईलाजाने खते खरेदी करावे लागत असून, ही एकप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. याशिवाय सरकारने जाहीर केलेल्या किमतीत किरकोळ वाढ करून खते विकली जात आहेत. युरियाची सरकारी किंमत २६६ रुपये आहे. परंतु, युरियाची एक बॅग २७० रुपयांना विकली जात असून, इतर खतांच्या किमतीतही अशी किरकोळ वाढ करण्यात आली आहे. किरकोळ दरवाढ करत नको असलेली खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याचे समोर आले आहे.

....

हा घ्या पुरावा

उसासाठी शेतकऱ्याने इफको कंपनीच्या युरियाच्या चार गोण्यांची मागणी केली. परंतु कृषी सेवा चालकाने या कंपनीचा युरिया शिल्लक नाही. काही दिवस थांबावे लागेल, असे शेतकऱ्याला सांगितले. शेतकऱ्याने दोन तरी द्या, अशी मागणी केल्यानंतर २७० रुपयाला आहे. चालेल का, अशी विचारणा कृषी सेवा चालकाने केली. त्यावर नाईलाजाने शेतकऱ्याने होकार दिला. आधी शिल्लक नाही, असे सांगितले. परंतु, ग्राहकाची गरज ओळखून २७० रुपयाला युरियाच्या दोन बॅग दिल्या.

......

केंद्र सरकारने अनुदान दिल्याने सर्व कंपन्यांच्या डीएपीची किंमत १२०० रुपये इतकी आहे. परंतु, टंचाई असल्याचे कारण देऊन कृषी सेवा चालकाने १२५५ रुपये किंमत सांगितली. त्यामुळे शेतकऱ्यानेही नाईलाजाने ५५ रुपये जास्तीचे देऊन डीएपी विकत घेतले.

....

उसाला पावसाळ्यापूर्वी डोस द्यायचा आहे म्हणून कृषी सेवा केंद्रात गेलाे. ज्या कंपन्यांची खते मागितली. त्या कंपन्यांची शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. इतर कंपन्यांची खते आहेत, हवी असल्यास देतो, असे उत्तर शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र चालकांकडून मिळत आहेत.

- नेवासा येथील शेतकरी

....

युरियाच्या दहा बॅग घ्यायच्या होत्या. परंतु, दोनच बॅग मिळाल्या. शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. खतांची टंचाई असल्याने भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत. पण, मागणीप्रमाणे खते मिळत नाहीत.

-शेवगाव येथील शेतकरी

....

जुने दर

इफको

१०:२६:२६- ११७५

१२:३२:१६- ११९०

२०:२०:०-९७५

डीएपी-११८५

....

आयपीएल

डीएपी-१२००

२०:२०:०-९७५

पोटॅश-८५०

....

महाधन

१०:२६:२६-१२७५

२४:२४:०-१३५०

....

सरदार

१०:२६:२६-१३७५

२०:२०:१३-१०००

१२:३२:१६-११९०

...

सुपर फोस्फेट-४००

.....

नवीन दर

युरिया-२६६.५

डीएपी-१२००

२४:२४:९-१४५०

२४:२४:०८-१५००

१०:२६:२६-११७५ ते १३७५

१२:३२:१६-११८५ ते १३१०