शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना चंद्रभागा नदीत अभिषेक घालणार, दिंडी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:27 IST

नेवासा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील नेवासा ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली.

नेवासा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील नेवासा ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते गुरुवर्य ब्रम्हलिन बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या या दिंडीला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत.ज्ञानेश्वरीच्या रचनास्थान असलेल्या या दिंडीचे महत्व पंढरपूरमध्ये मोठे आहे.

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून विश्वस्त मंडळाने दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.एकादशीच्या आदल्या दिवशी शासनाची परवानगी घेऊन पंढरपूरला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका नेल्या जाईल तेथे चंद्रभागा नदीत पादुकांना अभिषेक घालण्यात येईल त्यानंतर आरती व क्षेत्र प्रदक्षिणा घालून पादुका पुन्हा नेवासा येथे आणल्या जातील, असा ही निर्णय यावेळी ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या प्रसंगी घेण्यात आला.यावेळी झालेल्या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष अँड.माधवराव दरंदले, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग,भिकाजी जंगले,रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे,कृष्णाभाऊ पिसोटे,कैलास जाधव हे उपस्थित होते.

देशात व महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्व देवस्थानने घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर देखील तेव्हापासून बंद आहे परिसराची स्वच्छता व पूजाअर्चा फक्त नित्यनेमाने केली जाते.यंदा तरी दिंडी निघेल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना होती मात्र कोरोनाचे संकट अजून ही देशात व महाराष्ट्रात असल्याने शासन निर्णय देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असल्याने त्या निर्णयाचा मान ठेऊन व राष्ट्रीय कर्तव्य समजून यंदाची आषाढी वारी दिंडी रद्द करण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानने घेतला असल्याने कोणीही दिंडीसाठी मंदिरात येऊ नये असे आवाहन हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्यासह संस्थानच्या विश्वस्त मंडळाने वारकरी भक्तांना केले आहे.