शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना चंद्रभागा नदीत अभिषेक घालणार, दिंडी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:27 IST

नेवासा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील नेवासा ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली.

नेवासा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील नेवासा ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पायी आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते गुरुवर्य ब्रम्हलिन बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या या दिंडीला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत.ज्ञानेश्वरीच्या रचनास्थान असलेल्या या दिंडीचे महत्व पंढरपूरमध्ये मोठे आहे.

नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून विश्वस्त मंडळाने दिंडी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.एकादशीच्या आदल्या दिवशी शासनाची परवानगी घेऊन पंढरपूरला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका नेल्या जाईल तेथे चंद्रभागा नदीत पादुकांना अभिषेक घालण्यात येईल त्यानंतर आरती व क्षेत्र प्रदक्षिणा घालून पादुका पुन्हा नेवासा येथे आणल्या जातील, असा ही निर्णय यावेळी ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या प्रसंगी घेण्यात आला.यावेळी झालेल्या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष अँड.माधवराव दरंदले, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग,भिकाजी जंगले,रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे,कृष्णाभाऊ पिसोटे,कैलास जाधव हे उपस्थित होते.

देशात व महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्व देवस्थानने घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर देखील तेव्हापासून बंद आहे परिसराची स्वच्छता व पूजाअर्चा फक्त नित्यनेमाने केली जाते.यंदा तरी दिंडी निघेल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना होती मात्र कोरोनाचे संकट अजून ही देशात व महाराष्ट्रात असल्याने शासन निर्णय देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असल्याने त्या निर्णयाचा मान ठेऊन व राष्ट्रीय कर्तव्य समजून यंदाची आषाढी वारी दिंडी रद्द करण्याचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानने घेतला असल्याने कोणीही दिंडीसाठी मंदिरात येऊ नये असे आवाहन हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्यासह संस्थानच्या विश्वस्त मंडळाने वारकरी भक्तांना केले आहे.