शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जखमेवर मलमपट्टी नव्हे़, गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणार-सागर पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 13:28 IST

नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी येणा-या काळात पोलिसांची भूमिका केवळ मलमपट्टीची राहणार नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालून ती समूळ नष्ट करणार असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ़सागर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

संडे स्पेशल मुलाखत / अरुण वाघमोडे ।  भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्हा जसा विस्ताराने मोठा आहे. तसे गुन्हेगारीचे प्रमाणही येथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी येणा-या काळात पोलिसांची भूमिका केवळ मलमपट्टीची राहणार नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालून ती समूळ नष्ट करणार असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ़सागर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मनुष्यबळ पुरेसे आहे का ? जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत येथे मनुष्यबळाची कमतरता आहे़ जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस स्टेशन आणि पोलीस दूरक्षेत्र व्हावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत. हे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. सध्या उपलब्ध आहे ते मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या माध्यमातून येत्या वर्षभरातील कामाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सराईत गुन्हेगारांना पोलीस लक्ष्य करणार आहेत़.गुन्हेगारी नियंत्रणावर उपाययोजना काय आहेत? मागील वर्षात १७ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली. एमपीडीएची सर्वाधिक कारवाई करणारा राज्यात नगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. एमपीडीएसह मोक्का कायद्यातंर्गतही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आणि नव्याने गुन्हेगारीकडे वळलेल्यांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच गल्लीतील दादा आणि गावगुंडांवरही आता पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. शहरांसह ग्रामीण भागात वास्तव्य करणा-या जनतेला अवैध व्यवसायाबाबत माहिती असेल अथवा त्यांना गुंडांकडून त्रास होत असेल तर जनतेने तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. वाळूतस्करांवर वॉच कसा ठेवता ?पाटील : वाळूतस्करीतून जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. यासाठी गेल्या वर्षभरापासून वाळूतस्करांवर कडक कारवाई केली जात आहे. एमपीडीए व मोक्का कायद्यातंर्गत कारवाई झालेले सर्वाधिक गुन्हेगार हे वाळूतस्कर आहेत. जिल्ह्यात वाळूतस्करी होते त्या तालुक्यातील ठिकाणांची माहिती पोलिसांकडे आहेत. येणा-या काळात या ठिकाणांवर पोलीस कायम वॉच ठेवणार आहेत. तसेच वाळूतस्करांचीही माहिती ठेवण्यात येणार असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले.सायबरचे मनुष्यबळ वाढविणार डिजिटल तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यातील बहुतांशी गुन्ह्यांचा तपास हा किचकट आणि आव्हानात्मक असतो. तपासकामाला गती यावी, यासाठी सायबर पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढविणे व त्यांना अपेक्षित असलेला सर्व तो टेक्निक बॅकअप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेतपोलीस तपासात सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका निभावत असतात. शहरात विविध गुन्हेगारीच्या घटना घडतात. एखाद्या घटनेतील आरोपींची ओळख पटविणे अवघड जाते. मात्र हे गुन्हेगार कुठे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले तर त्यांना शोधणे सोपे जाते. यासाठी नगर शहरातील छोटे, मोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर, कार्यालयांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. याबाबत पुन्हा एकदा व्यापारी संघटनेची बैठक घेऊन त्यांना कॅमेरे बसविण्याबाबत सांगण्यात येणार आहेत. हे कॅमेरे संबंधित दुकानदार व व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पाटील म्हणाले. रस्त्यालुटीला आवर कसा घालणार?नगर जिल्ह्णातील गेल्या दीड ते दोन वर्षांतील रस्तालुटीच्या घटनांचे अवलोकन केले तर सर्वाधिक घटना या महामार्गावर झालेल्या आहेत. यासाठी शहरातून जाणा-या महामार्गावर सध्या रात्रीचे पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस वाहनाच्या फे-या वाढविण्यात येणार आहेत. तसेच नगर शहरातही रात्रीचे पेट्रोलिंग वाढविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNew Yearनववर्षinterviewमुलाखतpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय