शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नगरहून बांग्लादेशाकडे निघाली सद्भावना सायकल रॅली, तीन हजार किमीचे अंतर : अण्णा हजारेंच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 14:00 IST

अहमदनगर : दोन देश, पाच राज्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

अहमदनगर : दोन देश, पाच राज्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

नगर शहरातील भूईकोट किल्ला परिसरातून रॅलीला सुरूवात झाली. १०० सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व बांग्लादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेच्या वतीने ागांधी जयंतीच्या निमित्ताने या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी हजारे यांच्यासह ज्येष्ठ गांधीवादी नेते डाॅ. एस. एन. सुब्बाराव, पद्मश्री पोपटराव पवार, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी आदी उपस्थित होते. अण्णा हजारे यांनी रॅलीला शुभेच्छा देताना तरूणांनी देशसेवेसाठी वाहून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. युवाशक्ती जागृत झाली तर देशाचे भवितव्य उज्जल ठरेल. जीवनात ध्येय ठरवल्याशिवाय उद्दिष्टापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे तरूणांनी गावाची, समाजाची, देशाची सेवा करण्याचे ध्येय ठेवून काम करावे, असे ते म्हणाले.

पवार म्हणाले की, भारत जोडो अभियान या रॅलीतून अधिक सक्षम होईल. तरूणांनी, विशेषता महाविद्यालयीन मुलांनी यात घेतलेला सहभाग उल्लेखनीय आहे. सुब्बाराव यांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे दाखले देत बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याचा आढावा घेतला. महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जे मागील दोन हजार वर्षांत झाले नाही, ते गांधीजींनी अहिंसेतून करून दाखवले. त्यामुळे त्यांचा वसा, प्रेरणा तरूणांनी घेऊन देश व समाजमन जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. सुब्बाराव यांनी गायलेल्या क्रांतीगिताने रॅलीतील सायकलस्वारांना संदेश देण्यात आला. यात्रेत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, तसेच हिवरेबाजारचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

---------------

या यात्रेत १०० सायकलस्वार नगरमधून सहभागी झाले. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल व बांग्लादेशातून सुमारे ३ हजार किमीचा प्रवास ही रॅली करणार आहे. रस्त्यामध्येही काही स्वयंसेवी या रॅलीत सहभागी होणार आहेत. दोन देशांत, तसेच समाजासमाजात मैत्री आणि सद्वाव वाढविण्यासाठी ही यात्रा आहे.

----------------

फोटो - ०२सद्भावना रॅली

तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, एस. एन. सुब्बाराव, पोपटराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे