शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नगरहून बांग्लादेशाकडे निघाली सद्भावना सायकल रॅली, तीन हजार किमीचे अंतर : अण्णा हजारेंच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 14:00 IST

अहमदनगर : दोन देश, पाच राज्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

अहमदनगर : दोन देश, पाच राज्य असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

नगर शहरातील भूईकोट किल्ला परिसरातून रॅलीला सुरूवात झाली. १०० सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व बांग्लादेश मुक्ती संग्रामाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून स्नेहालय संस्थेच्या वतीने ागांधी जयंतीच्या निमित्ताने या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी हजारे यांच्यासह ज्येष्ठ गांधीवादी नेते डाॅ. एस. एन. सुब्बाराव, पद्मश्री पोपटराव पवार, मेहेरबाबा ट्रस्टचे मेहेरनाथ कलचुरी आदी उपस्थित होते. अण्णा हजारे यांनी रॅलीला शुभेच्छा देताना तरूणांनी देशसेवेसाठी वाहून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. युवाशक्ती जागृत झाली तर देशाचे भवितव्य उज्जल ठरेल. जीवनात ध्येय ठरवल्याशिवाय उद्दिष्टापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे तरूणांनी गावाची, समाजाची, देशाची सेवा करण्याचे ध्येय ठेवून काम करावे, असे ते म्हणाले.

पवार म्हणाले की, भारत जोडो अभियान या रॅलीतून अधिक सक्षम होईल. तरूणांनी, विशेषता महाविद्यालयीन मुलांनी यात घेतलेला सहभाग उल्लेखनीय आहे. सुब्बाराव यांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे दाखले देत बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याचा आढावा घेतला. महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जे मागील दोन हजार वर्षांत झाले नाही, ते गांधीजींनी अहिंसेतून करून दाखवले. त्यामुळे त्यांचा वसा, प्रेरणा तरूणांनी घेऊन देश व समाजमन जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले. सुब्बाराव यांनी गायलेल्या क्रांतीगिताने रॅलीतील सायकलस्वारांना संदेश देण्यात आला. यात्रेत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, तसेच हिवरेबाजारचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

---------------

या यात्रेत १०० सायकलस्वार नगरमधून सहभागी झाले. महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल व बांग्लादेशातून सुमारे ३ हजार किमीचा प्रवास ही रॅली करणार आहे. रस्त्यामध्येही काही स्वयंसेवी या रॅलीत सहभागी होणार आहेत. दोन देशांत, तसेच समाजासमाजात मैत्री आणि सद्वाव वाढविण्यासाठी ही यात्रा आहे.

----------------

फोटो - ०२सद्भावना रॅली

तीन हजार किलोमीटरचा प्रवास असणाऱ्या नगर-बांग्लादेश सद्भावना रॅलीच्या प्रवासाला शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, एस. एन. सुब्बाराव, पोपटराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे