शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी तयार केलेली नियमावली किचकट - विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:19 IST

लोणी -ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली ही अतिशय किचकट आणि प्रशासकीय स्‍तरावर वेळकाढुपणाची ठरणार असल्‍याने हे परिपत्रक मागे घ्‍यावे, आणि ऊस तोडणी मजुरांची आहे त्‍याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्‍या  गाड्यांमधुन त्‍यांना गावी सुरक्षित पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे यांनी केली आहे.

लोणी -ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍यासाठी शासनाने तयार केलेली नियमावली ही अतिशय किचकट आणि प्रशासकीय स्‍तरावर वेळकाढुपणाची ठरणार असल्‍याने हे परिपत्रक मागे घ्‍यावे, आणि ऊस तोडणी मजुरांची आहे त्‍याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्‍या  गाड्यांमधुन त्‍यांना गावी सुरक्षित पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे यांनी केली आहे.

       या संदर्भात विखे पाटील म्‍हणाले की, मागील गळीत  हंगामासाठी गेलेल्‍या ऊस तोडणी मजुरांना कोरोनाच्‍या संकटामुळे आहे त्‍याच ठिकाणी अडकुन पडावे लागले आहे. लॉकडाऊनच्‍या पार्श्‍वभूमिवर ऊस तोडणी मजुरांपुढील समस्‍याही वाढत गेल्‍या आहेत. यासाठी शासनाने ऊस तोडणी मजुरांच्‍या संदर्भात निर्णय करावा अशी मागणी आपण यापुर्वीच केली होती. परंतू याबाबत राज्‍य सरकारने निर्णय केला असला तरी, ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या  गावी पोहचविण्‍याबाबत  सरकारने तयार केलेली नियमावली अतिशय किचकट आणि विलंबांची ठरणार असल्‍यामुळे ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचण्‍यास मोठी अडचण निर्माण होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली.

याबाबत साखर आयुक्‍त कार्यालयाने काढलेल्‍या पत्रकाचा हवाला देवून आ.विखे पाटील म्‍हणाले की, ऊस तोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी पोहचविण्‍या संदर्भात प्रस्‍ताव तयार करण्‍यापासुन ते या मजुरांना पोहचविण्‍यासाठी वाहतुक परवाने मिळविण्‍याबाबतची किचकट प्रक्रीया पाहाता ऊस तोडणी मजुर त्‍यांच्‍या  गावी पोहचणार कधी असा सवाल आ.विखे पाटील यांनी उपस्थित केला.

गेल्‍या अनेक महीन्‍यांपासुन ऊस तोडणी कामगार आपल्‍या गावापासुन आणि कुटुंबापासुन दुर राहत आहेत. तसेच त्‍यांची शेती पावसावर अवलंबुन असल्‍यामुळे खरीप हंगाम जवळ आला असल्‍याने शेतातील पुर्व मशागतीची कामे करण्‍यासाठी यासर्व ऊसतोडणी मजुरांना त्‍यांच्‍या गावी जाणे अत्‍यंत गरजेचे असल्‍याचे स्‍पष्‍ट  करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की, मागील गळीत हंगाम संपल्‍यानंतरही कोरोनाच्‍या आपत्‍तीमुळे ऊस तोडणी मजुर आहे त्‍याच ठिकाणी अडकुन पडले आहेत. प्रशासकीय बाबींमुळे त्‍यांना गावी पोहचणे शक्‍य होणार नसेल तर शासन निर्णय होवून उपयोग काय? यासाठी ऊस तोडणी कामगारांची आहे त्‍याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करुन एस.टी महामंडळाच्‍या बस मधुन त्‍यांच्‍या  संबधित गावी सुरक्षित पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍याबाबत सरकारने विचार करावा. सरकारच्‍या आदेशाप्रमाणे मजुर वाहतुक करताना सोशल डिस्‍टंसिंग पाळण्‍याबाबतच्‍या सुचना केल्‍या असुन याची अंमलबजावणी एस.टी बस मधुनच होवू शकते याकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

परिवहन विभागाची राज्‍यातील सर्व वाहतुक सध्‍या बंद असल्‍यामुळे एस.टी बसचा उपयोग ऊस तोडणी मजुरांना पोहचविण्‍यासाठी योग्‍य होईल. संबधित तालुक्‍यांच्‍या स्‍थानिक प्रशासनावर यासर्व ऊस तोडणी मजुरांचा तपासणी अहवाल तयार करण्‍याची जबाबदारी द्यावी असेही आ.विखे पाटील यांनी सुचित करताना ऊस तोडणी मजुरांचे स्‍थलांतरण शासकीय यंत्रणेतुनच सुरक्षित होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.