शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव ...

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव बदलण्याबाबत राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनाही रस नसल्याचे दिसते आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंबिकानगर नामकरण करण्याच्या मागणीला पाठिंबा असल्याचे शहर शिवसेनेने सांगितले. याव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांना या विषयात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणीही शिवसेनेने केली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. लोखंडे हे फक्त माध्यमांशी बोलले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी कोणाकडेही मागणी केलेली नाही. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे सांगून लोखंडे यांनी नगरच्या नामांतराची हवा गरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नगर शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे नेते यांनी मात्र कानाडोळा केला आहे. या विषयावर काय बोलायचे, यात आम्हाला फारसा रस नसल्याचेच नगर शहरातील राजकीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराचा विषय आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे नगरमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही नगरच्या नामांतराबाबत चिडीचूप आहेत. सेनेच्या खासदारांनी मागणी केल्यानंतर ती उचलून धरण्यात नगर शहर शिवसेनेलाही रस नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरांनीही नामांतराबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून, महापालिकेतील नगरसेवकांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, अहमदनगर शहराचे नाव बदलले तर जिल्ह्याचे नावही बदलेल. त्यामुळे नामांतराचा प्रश्न काही एकट्या शहरापुरता नाही, अशी भूमिका शहरातील नेत्यांनी मांडली आहे.

---------

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीच होती इच्छा

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला वाडिया पार्कवर जाहीर सभा झाली होती. त्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचे आदेश दिले होते. नगरजवळील केडगाव येथील मंदिरातील रेणुकामाता ही अंबिकामाता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचेच नाव अहमदनगर शहराला द्यावे, असे त्यांनी या आदेशातून सुचवले होते; पण त्यावेळी राज्यात असलेल्या युती सरकारने या आदेशाची फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर मागील २५-३० वर्षांत अधूनमधून ही नामांतर मागणी होत गेली. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही अशी मागणी केली होती. आता शिवसेनेच्याच शिर्डीच्या खासदाराने पुन्हा ही मागणी करून विषय छेडला आहे; पण त्यांच्या या मागणीला स्थानिक जिल्ह्याच्या स्तरावर राजकीय पाठिंबा मिळणे कठीण असल्याचे दिसते आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आता शिवसेनेत असले तरी त्यांच्याकडून या विषयाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा होईल की नाही, याचीही उत्सुकता आहे.

-----------

पाचशे वर्षांचा इतिहास

पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमद निजामशहा याने नगरजवळील भिंगार येथे झालेल्या युद्धात जहांगीर खानचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ रोवली. तो दिवस होता २८ मे १४९०. हे शहर अहमद निजामशहाने वसविल्याने या शहराला अहमदनगर हे नाव पडले.

--------------------------