शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव ...

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव बदलण्याबाबत राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनाही रस नसल्याचे दिसते आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंबिकानगर नामकरण करण्याच्या मागणीला पाठिंबा असल्याचे शहर शिवसेनेने सांगितले. याव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांना या विषयात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणीही शिवसेनेने केली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. लोखंडे हे फक्त माध्यमांशी बोलले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी कोणाकडेही मागणी केलेली नाही. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे सांगून लोखंडे यांनी नगरच्या नामांतराची हवा गरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नगर शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे नेते यांनी मात्र कानाडोळा केला आहे. या विषयावर काय बोलायचे, यात आम्हाला फारसा रस नसल्याचेच नगर शहरातील राजकीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराचा विषय आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे नगरमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही नगरच्या नामांतराबाबत चिडीचूप आहेत. सेनेच्या खासदारांनी मागणी केल्यानंतर ती उचलून धरण्यात नगर शहर शिवसेनेलाही रस नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरांनीही नामांतराबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून, महापालिकेतील नगरसेवकांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, अहमदनगर शहराचे नाव बदलले तर जिल्ह्याचे नावही बदलेल. त्यामुळे नामांतराचा प्रश्न काही एकट्या शहरापुरता नाही, अशी भूमिका शहरातील नेत्यांनी मांडली आहे.

---------

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीच होती इच्छा

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला वाडिया पार्कवर जाहीर सभा झाली होती. त्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचे आदेश दिले होते. नगरजवळील केडगाव येथील मंदिरातील रेणुकामाता ही अंबिकामाता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचेच नाव अहमदनगर शहराला द्यावे, असे त्यांनी या आदेशातून सुचवले होते; पण त्यावेळी राज्यात असलेल्या युती सरकारने या आदेशाची फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर मागील २५-३० वर्षांत अधूनमधून ही नामांतर मागणी होत गेली. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही अशी मागणी केली होती. आता शिवसेनेच्याच शिर्डीच्या खासदाराने पुन्हा ही मागणी करून विषय छेडला आहे; पण त्यांच्या या मागणीला स्थानिक जिल्ह्याच्या स्तरावर राजकीय पाठिंबा मिळणे कठीण असल्याचे दिसते आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आता शिवसेनेत असले तरी त्यांच्याकडून या विषयाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा होईल की नाही, याचीही उत्सुकता आहे.

-----------

पाचशे वर्षांचा इतिहास

पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमद निजामशहा याने नगरजवळील भिंगार येथे झालेल्या युद्धात जहांगीर खानचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ रोवली. तो दिवस होता २८ मे १४९०. हे शहर अहमद निजामशहाने वसविल्याने या शहराला अहमदनगर हे नाव पडले.

--------------------------