शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव ...

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव बदलण्याबाबत राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनाही रस नसल्याचे दिसते आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंबिकानगर नामकरण करण्याच्या मागणीला पाठिंबा असल्याचे शहर शिवसेनेने सांगितले. याव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांना या विषयात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणीही शिवसेनेने केली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. लोखंडे हे फक्त माध्यमांशी बोलले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी कोणाकडेही मागणी केलेली नाही. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे सांगून लोखंडे यांनी नगरच्या नामांतराची हवा गरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नगर शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे नेते यांनी मात्र कानाडोळा केला आहे. या विषयावर काय बोलायचे, यात आम्हाला फारसा रस नसल्याचेच नगर शहरातील राजकीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराचा विषय आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे नगरमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही नगरच्या नामांतराबाबत चिडीचूप आहेत. सेनेच्या खासदारांनी मागणी केल्यानंतर ती उचलून धरण्यात नगर शहर शिवसेनेलाही रस नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरांनीही नामांतराबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून, महापालिकेतील नगरसेवकांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, अहमदनगर शहराचे नाव बदलले तर जिल्ह्याचे नावही बदलेल. त्यामुळे नामांतराचा प्रश्न काही एकट्या शहरापुरता नाही, अशी भूमिका शहरातील नेत्यांनी मांडली आहे.

---------

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीच होती इच्छा

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला वाडिया पार्कवर जाहीर सभा झाली होती. त्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचे आदेश दिले होते. नगरजवळील केडगाव येथील मंदिरातील रेणुकामाता ही अंबिकामाता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचेच नाव अहमदनगर शहराला द्यावे, असे त्यांनी या आदेशातून सुचवले होते; पण त्यावेळी राज्यात असलेल्या युती सरकारने या आदेशाची फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर मागील २५-३० वर्षांत अधूनमधून ही नामांतर मागणी होत गेली. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही अशी मागणी केली होती. आता शिवसेनेच्याच शिर्डीच्या खासदाराने पुन्हा ही मागणी करून विषय छेडला आहे; पण त्यांच्या या मागणीला स्थानिक जिल्ह्याच्या स्तरावर राजकीय पाठिंबा मिळणे कठीण असल्याचे दिसते आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आता शिवसेनेत असले तरी त्यांच्याकडून या विषयाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा होईल की नाही, याचीही उत्सुकता आहे.

-----------

पाचशे वर्षांचा इतिहास

पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमद निजामशहा याने नगरजवळील भिंगार येथे झालेल्या युद्धात जहांगीर खानचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ रोवली. तो दिवस होता २८ मे १४९०. हे शहर अहमद निजामशहाने वसविल्याने या शहराला अहमदनगर हे नाव पडले.

--------------------------