शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव ...

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव बदलण्याबाबत राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनाही रस नसल्याचे दिसते आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंबिकानगर नामकरण करण्याच्या मागणीला पाठिंबा असल्याचे शहर शिवसेनेने सांगितले. याव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांना या विषयात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणीही शिवसेनेने केली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. लोखंडे हे फक्त माध्यमांशी बोलले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी कोणाकडेही मागणी केलेली नाही. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे सांगून लोखंडे यांनी नगरच्या नामांतराची हवा गरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नगर शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे नेते यांनी मात्र कानाडोळा केला आहे. या विषयावर काय बोलायचे, यात आम्हाला फारसा रस नसल्याचेच नगर शहरातील राजकीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराचा विषय आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे नगरमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही नगरच्या नामांतराबाबत चिडीचूप आहेत. सेनेच्या खासदारांनी मागणी केल्यानंतर ती उचलून धरण्यात नगर शहर शिवसेनेलाही रस नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरांनीही नामांतराबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून, महापालिकेतील नगरसेवकांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, अहमदनगर शहराचे नाव बदलले तर जिल्ह्याचे नावही बदलेल. त्यामुळे नामांतराचा प्रश्न काही एकट्या शहरापुरता नाही, अशी भूमिका शहरातील नेत्यांनी मांडली आहे.

---------

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीच होती इच्छा

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला वाडिया पार्कवर जाहीर सभा झाली होती. त्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचे आदेश दिले होते. नगरजवळील केडगाव येथील मंदिरातील रेणुकामाता ही अंबिकामाता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचेच नाव अहमदनगर शहराला द्यावे, असे त्यांनी या आदेशातून सुचवले होते; पण त्यावेळी राज्यात असलेल्या युती सरकारने या आदेशाची फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर मागील २५-३० वर्षांत अधूनमधून ही नामांतर मागणी होत गेली. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही अशी मागणी केली होती. आता शिवसेनेच्याच शिर्डीच्या खासदाराने पुन्हा ही मागणी करून विषय छेडला आहे; पण त्यांच्या या मागणीला स्थानिक जिल्ह्याच्या स्तरावर राजकीय पाठिंबा मिळणे कठीण असल्याचे दिसते आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आता शिवसेनेत असले तरी त्यांच्याकडून या विषयाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा होईल की नाही, याचीही उत्सुकता आहे.

-----------

पाचशे वर्षांचा इतिहास

पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमद निजामशहा याने नगरजवळील भिंगार येथे झालेल्या युद्धात जहांगीर खानचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ रोवली. तो दिवस होता २८ मे १४९०. हे शहर अहमद निजामशहाने वसविल्याने या शहराला अहमदनगर हे नाव पडले.

--------------------------