शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
4
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
5
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
6
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
7
अनेक वर्ष एकत्र, नंतर प्रियकराचं ठरलं लग्न; व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली...
8
७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
9
थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
10
अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाला ED चा जबर दणका; FD, बँक बॅलन्ससह १,१२० कोटींची संपत्ती जप्त
11
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
12
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
13
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
14
मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
15
सरकार म्हणते, बघा विकासाची गती, विरोधक म्हणतात, ही तर अधोगती!
16
तुमचा पतीही इतर महिलांचे फोटो लाईक्स करतोय?; तुर्की कोर्टानं सुनावलेला 'हा' निकाल एकदा वाचाच
17
"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
18
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
19
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
20
२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

अंडी विक्रीचे रोल मॉडेल देशभर राबविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST

डॉ. कुमार यांनी बुधवारी (दि. १८) तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन ...

डॉ. कुमार यांनी बुधवारी (दि. १८) तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजय थोरे, कोपरगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे आदी उपस्थित होते. सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोनाच्या काळात दररोज एक ते दीड लाख अंडी विक्री केली. संगमनेर, कोपरगाव व सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील पोल्ट्री फार्मधारक शेतकऱ्यांकडून ही अंडी गोळा करुन मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी अंडी पुरवली गेली. कंपनीच्या या उपक्रमाची दखल राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने घेतली. त्यामुळे या कंपनीचे कार्य जाणून घेण्यासाठी डाॅ. कुमार हे चिंचोली गुरव येथे आले होते. त्यांना कंपनीचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक सुखलाल गांगवे यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी कंपनीचे संचालक राजेंद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, अशोक गडाख, डॉ. सुहास आभाळे, अजित मुंगसे, समाधान गुंजाळ, अण्णासाहेब गांगवे, सोमनाथ झिंजुर्डे उपस्थित होते.

...................

लॉकडाऊनला मानले संधी

कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली. स्थापनेनंतर काहीच दिवसात कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटित करुन अंडी विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कंपनीने एक वाहन विकत घेतले. या वाहनातून शेतकऱ्यांच्या पॉल्ट्री फार्मवरुन अंडी गोळा केली जात होती. ही अंडी मोठ्या शहरांमध्ये विकली गेली. आत्ताही अशाच पद्धतीने ही अंडी विकली जात आहेत. कंपनीचे तीनशेहून अधिक शेतकरी सभासद आहेत. हे सर्व शेतकरी दुष्काळी पट्ट्यातील आहेत. लॉकडाऊन काळात अंडी विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणे मोठे आव्हान होते. अनेक व्यापारी कमी किमतीत अंडे खरेदी करीत होते. त्याचवेळी अफवा पसरल्यामुळे ग्राहकही अंडी विकत घेत नव्हते. अशा परिस्थितीत कंपनीने सर्व शेतकऱ्यांकडील अंडी गोळा केली अन् पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादमधील व्यापाऱ्यांना विकली. कोरोनाच्या संकटाला संधी मानून कंपनीने काम केले. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे थेट ऑनलाईनद्वारे खात्यावर जमा करण्यात येतात, अशी माहिती गांगवे यांनी दिली.

...............

शेतकऱ्यांचा फायदा

कोंबडी खाद्य एकत्रित खरेदी केल्याने पैसे वाचतात. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टळते. अनेकदा व्यापारी कोणतेही कारण सांगून कमी किमतीत अंडी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन अंडी विक्री सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला, असे गांगवे यांनी सांगितले.