शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अंडी विक्रीचे रोल मॉडेल देशभर राबविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST

डॉ. कुमार यांनी बुधवारी (दि. १८) तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन ...

डॉ. कुमार यांनी बुधवारी (दि. १८) तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजय थोरे, कोपरगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे आदी उपस्थित होते. सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोनाच्या काळात दररोज एक ते दीड लाख अंडी विक्री केली. संगमनेर, कोपरगाव व सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील पोल्ट्री फार्मधारक शेतकऱ्यांकडून ही अंडी गोळा करुन मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी अंडी पुरवली गेली. कंपनीच्या या उपक्रमाची दखल राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने घेतली. त्यामुळे या कंपनीचे कार्य जाणून घेण्यासाठी डाॅ. कुमार हे चिंचोली गुरव येथे आले होते. त्यांना कंपनीचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक सुखलाल गांगवे यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी कंपनीचे संचालक राजेंद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, अशोक गडाख, डॉ. सुहास आभाळे, अजित मुंगसे, समाधान गुंजाळ, अण्णासाहेब गांगवे, सोमनाथ झिंजुर्डे उपस्थित होते.

...................

लॉकडाऊनला मानले संधी

कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली. स्थापनेनंतर काहीच दिवसात कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटित करुन अंडी विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कंपनीने एक वाहन विकत घेतले. या वाहनातून शेतकऱ्यांच्या पॉल्ट्री फार्मवरुन अंडी गोळा केली जात होती. ही अंडी मोठ्या शहरांमध्ये विकली गेली. आत्ताही अशाच पद्धतीने ही अंडी विकली जात आहेत. कंपनीचे तीनशेहून अधिक शेतकरी सभासद आहेत. हे सर्व शेतकरी दुष्काळी पट्ट्यातील आहेत. लॉकडाऊन काळात अंडी विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणे मोठे आव्हान होते. अनेक व्यापारी कमी किमतीत अंडे खरेदी करीत होते. त्याचवेळी अफवा पसरल्यामुळे ग्राहकही अंडी विकत घेत नव्हते. अशा परिस्थितीत कंपनीने सर्व शेतकऱ्यांकडील अंडी गोळा केली अन् पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादमधील व्यापाऱ्यांना विकली. कोरोनाच्या संकटाला संधी मानून कंपनीने काम केले. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे थेट ऑनलाईनद्वारे खात्यावर जमा करण्यात येतात, अशी माहिती गांगवे यांनी दिली.

...............

शेतकऱ्यांचा फायदा

कोंबडी खाद्य एकत्रित खरेदी केल्याने पैसे वाचतात. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टळते. अनेकदा व्यापारी कोणतेही कारण सांगून कमी किमतीत अंडी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन अंडी विक्री सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला, असे गांगवे यांनी सांगितले.