शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अंडी विक्रीचे रोल मॉडेल देशभर राबविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST

डॉ. कुमार यांनी बुधवारी (दि. १८) तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन ...

डॉ. कुमार यांनी बुधवारी (दि. १८) तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजय थोरे, कोपरगाव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे आदी उपस्थित होते. सुरावी शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोनाच्या काळात दररोज एक ते दीड लाख अंडी विक्री केली. संगमनेर, कोपरगाव व सिन्नर (जि. नाशिक) तालुक्यातील पोल्ट्री फार्मधारक शेतकऱ्यांकडून ही अंडी गोळा करुन मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी अंडी पुरवली गेली. कंपनीच्या या उपक्रमाची दखल राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने घेतली. त्यामुळे या कंपनीचे कार्य जाणून घेण्यासाठी डाॅ. कुमार हे चिंचोली गुरव येथे आले होते. त्यांना कंपनीचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक सुखलाल गांगवे यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी कंपनीचे संचालक राजेंद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, अशोक गडाख, डॉ. सुहास आभाळे, अजित मुंगसे, समाधान गुंजाळ, अण्णासाहेब गांगवे, सोमनाथ झिंजुर्डे उपस्थित होते.

...................

लॉकडाऊनला मानले संधी

कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली. स्थापनेनंतर काहीच दिवसात कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटित करुन अंडी विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कंपनीने एक वाहन विकत घेतले. या वाहनातून शेतकऱ्यांच्या पॉल्ट्री फार्मवरुन अंडी गोळा केली जात होती. ही अंडी मोठ्या शहरांमध्ये विकली गेली. आत्ताही अशाच पद्धतीने ही अंडी विकली जात आहेत. कंपनीचे तीनशेहून अधिक शेतकरी सभासद आहेत. हे सर्व शेतकरी दुष्काळी पट्ट्यातील आहेत. लॉकडाऊन काळात अंडी विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणे मोठे आव्हान होते. अनेक व्यापारी कमी किमतीत अंडे खरेदी करीत होते. त्याचवेळी अफवा पसरल्यामुळे ग्राहकही अंडी विकत घेत नव्हते. अशा परिस्थितीत कंपनीने सर्व शेतकऱ्यांकडील अंडी गोळा केली अन् पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादमधील व्यापाऱ्यांना विकली. कोरोनाच्या संकटाला संधी मानून कंपनीने काम केले. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे थेट ऑनलाईनद्वारे खात्यावर जमा करण्यात येतात, अशी माहिती गांगवे यांनी दिली.

...............

शेतकऱ्यांचा फायदा

कोंबडी खाद्य एकत्रित खरेदी केल्याने पैसे वाचतात. व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टळते. अनेकदा व्यापारी कोणतेही कारण सांगून कमी किमतीत अंडी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, आता शेतकऱ्यांनी संघटित होऊन अंडी विक्री सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला, असे गांगवे यांनी सांगितले.