शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

जिल्हा बँक भरतीत आयुक्तांची भूमिका संशयास्पद; शशिकांत चंगेडे यांची सचिवांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 10:39 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भरतीतील फेरफार केलेल्या संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीमार्फत तपासून तत्कालीन सहकार आयुक्त व नाशिकचे विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयीन आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे या अधिका-यांची चौकशी करुन तातडीने या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी सरकारी एजन्सीकडून करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सहकार विभागाच्या सचिवांकडे केली आहे. 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँक भरतीतील फेरफार केलेल्या संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीमार्फत तपासून तत्कालीन सहकार आयुक्त व नाशिकचे विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयीन आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे या अधिका-यांची चौकशी करुन तातडीने या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी सरकारी एजन्सीकडून करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी सहकार विभागाच्या सचिवांकडे केली आहे. जिल्हा बँक भरतीतील अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर चंगेडे यांनी सहकार विभागाकडे या भरतीबाबत लेखी तक्रार केली होती.  चौकशी समितीच्या अहवालात त्यांच्या तक्रारीचा उल्लेख आहे. आता चंगेडे यांनी पुन्हा सहकार विभागाचे प्रधान सचिव व सहकार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. या भरतीची न्यायालयीन आदेशानंतर जी फेरचौकशी करण्यात आली ती कायदेशीरपणे झालेली नाही, असे चंगेडे यांचे म्हणणे आहे.  या भरतीत अनेक उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत परीक्षेनंतर फेरफार करुन त्यांना गुणवत्ता यादीत आणले आहे. त्यामुळे या संशयास्पद उत्तरपत्रिकांत शाईमध्ये तफावत दिसत आहे. या उत्तरपत्रिका फॉरेन्सिक तपासणी करणाºया सरकारी एजन्सीकडून तपासून घ्या असा आदेश राम कुलकर्णी समिती व न्यायालयाने दिला आहे.  मात्र, तत्कालीन सहकार आयुक्त व विभागीय सहनिबंधक यांनी जाणीवपूर्वक खासगी एजन्सीकडून ही तपासणी केली. ही दिशाभूल आहे. या अधिकाºयांचीच भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या अधिकाºयांची चौकशी व्हावी, तसेच खासगी एजन्सीच्या अहवालाच्या आधारे भरती वैध ठरविणारा आदेश तत्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे. ‘नायबर’ला काळ्या यादीत टाका जिल्हा बँकेने ‘नायबर’ या संस्थेला भरतीचे काम दिले होते. मात्र, ‘नायबर’ या संस्थेने परस्पर अन्य संस्थेकडे भरतीचे काम सोपविले. हा कराराचा भंग व बेकायदेशीर बाब आहे. यात ‘नाबार्ड’च्या आदेशाचाही भंग आहे. भरती रद्द होण्यासाठी एवढाच मुद्दा पुरेसा आहे. मात्र, ‘नायबर’ने परस्पर अन्य एजन्सी नियुक्त केल्याचे माहिती असूनही जिल्हा बँक, नाबार्ड, सहकार विभाग यापैकी कुणीच या संस्थेवर काहीच कारवाई केलेली नाही. याचा अर्थ काय ? त्यामुळे ‘नायबर’ संस्था तातडीने काळ्या यादीत टाकून त्यांच्या पदाधिकाºयांवर तसेच जिल्हा बँकेच्या संचालकांवरही कारवाई करावी तसेच सहकार विभागाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निदर्शनास हा मुद्दा आणला होता का? याचीही तपासणी करण्याची मागणी चंगेडेंनी केली आहे. या मुद्यांच्या चौकशीची केली मागणी जिल्हा बँकेने प्रथम श्रेणी अधिकारी पदावर सक्षम अनुभव नसलेल्या उमेदवाराला नियुक्ती दिली आहे. या उमेदवाराच्या अनुभवाची तपासणी करण्यात यावी. विशाल बहिरम या उमेदवाराला नियुक्तीपत्र मिळालेले नाही, अशी तक्रार आहे. बँकेने काही उमेदवारांना नियुक्तीपत्रेच पाठवली नसल्याचा संशय आहे. त्यामुळे गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार हजर झालेले नाहीत त्यांना नियुक्तीपत्र मिळाले होते का? याची शासनानेच शहानिशा करावी, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांवर ठपका असताना त्यांना संचालक मंडळाने मुदतवाढ कशी दिली? याबाबतही चौकशी केली जावी, अशीही चंगेडे यांची मागणी आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्र