शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

रोहयोचे बजेट ठरणार ‘कामा’वर

By admin | Updated: August 10, 2014 23:28 IST

अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे.

अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे. यात गेल्या वर्षी पूर्ण झालेल्या आणि चालू वर्षी मंजूर कामांची सरासरी विचारात घेण्यात येणार आहेत. यंदा रोहयोचे बजेट तयार करण्यासाठी प्रत्येक गावात ११ विशिष्ट घटकांचे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात होणाऱ्या मागणीनुसार बजेट तयार करण्यात येणार आहे. हे १४ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येते. यापूर्वी दरवर्षी १५ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत जिल्हाभर प्रत्येक ग्रामपंचायतीत रोहयोचा वर्षभराचा आराखडा तयार करण्यात येत असे. मात्र, यंदा शासनाने ही पध्दत बदलली आहे. यापुढे रोहयोचा आराखडा तयार करण्यापूर्वी प्रत्येक गावात ग्रामरोजगार सेवक यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्याच्या सूचना सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वेक्षणात होणाऱ्या कामांच्या आणि रोजगारांच्या मागणीवर आधारित बजेट तयार करण्यात येणार आहे.८ ते १४ आॅगस्ट हा सर्वेक्षणाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. या दरम्यान प्रत्येक गावात ११ प्रकारातील विशिष्ट प्रवर्गातील कुटुंबाची माहिती आणि जॉब कार्ड, कामांची मागणी याची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच सन २०१३-१४ मध्ये झालेली कामे आणि २०१४-१५ मध्ये मंजूर कामांच्या आधारे २०१५-१६ चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे यंदा पासून रोहयोचा आराखडा ग्रामसभेत ढोबळ मानाने तयार न करता, प्रत्यक्षात झालेली कामे, मंजूर कामे आणि मागणीवर आधारित राहणार आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे गावागावात ग्रामरोजगार सेवकांमार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या १४ तारखेपर्यंत सर्वेक्षणावर आधारित मागणी संकलित होणार आहे. (प्रतिनिधी)