शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोचे बजेट ठरणार ‘कामा’वर

By admin | Updated: August 10, 2014 23:28 IST

अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे.

अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे. यात गेल्या वर्षी पूर्ण झालेल्या आणि चालू वर्षी मंजूर कामांची सरासरी विचारात घेण्यात येणार आहेत. यंदा रोहयोचे बजेट तयार करण्यासाठी प्रत्येक गावात ११ विशिष्ट घटकांचे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात होणाऱ्या मागणीनुसार बजेट तयार करण्यात येणार आहे. हे १४ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येते. यापूर्वी दरवर्षी १५ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत जिल्हाभर प्रत्येक ग्रामपंचायतीत रोहयोचा वर्षभराचा आराखडा तयार करण्यात येत असे. मात्र, यंदा शासनाने ही पध्दत बदलली आहे. यापुढे रोहयोचा आराखडा तयार करण्यापूर्वी प्रत्येक गावात ग्रामरोजगार सेवक यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्याच्या सूचना सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वेक्षणात होणाऱ्या कामांच्या आणि रोजगारांच्या मागणीवर आधारित बजेट तयार करण्यात येणार आहे.८ ते १४ आॅगस्ट हा सर्वेक्षणाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. या दरम्यान प्रत्येक गावात ११ प्रकारातील विशिष्ट प्रवर्गातील कुटुंबाची माहिती आणि जॉब कार्ड, कामांची मागणी याची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच सन २०१३-१४ मध्ये झालेली कामे आणि २०१४-१५ मध्ये मंजूर कामांच्या आधारे २०१५-१६ चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे यंदा पासून रोहयोचा आराखडा ग्रामसभेत ढोबळ मानाने तयार न करता, प्रत्यक्षात झालेली कामे, मंजूर कामे आणि मागणीवर आधारित राहणार आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे गावागावात ग्रामरोजगार सेवकांमार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या १४ तारखेपर्यंत सर्वेक्षणावर आधारित मागणी संकलित होणार आहे. (प्रतिनिधी)