शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

पाथर्डी तालुक्यातील रोहयो घोटाळा, दोषींवर फौजदारी कारवाई करा - न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:26 IST

तालुक्यातील एकनाथवाडी येथे सन २०११ ते २०१४ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने जनहीत याचिकेत जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सहा महिन्यात चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पाथर्डी : तालुक्यातील एकनाथवाडी येथे सन २०११ ते २०१४ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने जनहीत याचिकेत जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सहा महिन्यात चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तालुक्यात सन २०११ ते २०१४ या कालावधीत एकनाथवाडी येथे रोजगार हमी योजने अंतर्गत जागेवर कामे न करता अंध, अपंग, शासकीय नोकर, मयत मजूर कामावर दाखवून अर्धवट अवस्थेत यंत्राने कामे करून लाखो रुपयांची बिले काढण्यात आले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबा भगवान सानप यांनी १४ आॅक्टोबर २०१३ रोजी एकनाथवाडीचे तत्कालीन सरपंच तथा मनसेचा जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्यासह रोहयो कामाशी निगडीत अधिका-यांनी संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्या. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश झाले.दरम्यान, सानप यांच्या तक्रारीवरून राहुरी येथील पंचायत समितीचे कृषी अधिकारी व्ही.एच.पालवे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी एस.बी.काशीद, मोहीम अधिकारी डी.आर.राऊत यांनी रोहयो कामांची चौकशी केली असता एकनाथवाडी येथे रो.ह.यो. च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आठ रस्त्यांची तसेच वृक्ष लागवडीच्या कामाची इन-कॅमेरा चौकशी करण्यात आली होती. आठ पैकी पाच रस्त्यांवर थोड्या फार प्रमाणात कामे करून इतर तीन रस्त्यांची कामे न करताच सुमारे ६१ लाख ६५ हजार रुपयांच्या रकमेचे बिले काढून काँक्रिटीकरण रस्ता कामाचे अभिलेख, मोजमाप पुस्तिका हजेरी पत्रकावर हस्ताक्षर,स्वाक्ष?या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावती चौकशी समितीच्या निदर्शनास आल्या.याबाबत देविदास लिंबाजी खेडकर, तत्कालीन उपअभियंता के.ए.गीते, शाखा अभियंता एन.के.भणगे, शाखा अभियंता एस.एस.गडदे, तत्कालीन शाखा अभियंता डी.पी गावीत, प्रभारी उपअभियंता बि.डी.काकडे, ग्रामसेवक एस. बी.काळे तसेच सेवानिवृत्त कृषी अधिकारी एस,एम,कांबळे, तांत्रिक पॅनलचे वनाधिकारी सचिन वायकर, गटविकास अधिकारी तसेच ग्राम रोजगार सेवक गणेश खेडकर हे दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला होता. परंतु २०१४ पासून २०१८ पर्यंत राजकीय दबावामुळे दोषी कारवाईपासून वंचित राहिले होते. दोषीवर कारवाईचे आदेश होवूनही पुढे गैरव्यवहारातील दोषीवर काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे ग्रामस्थ बाबा सानप यांनी उच्च न्यायालय मुंबई,खंडपीठ औरंगाबाद येथे प्रशासना विरुद्ध वकील प्रशांत नांगरे यांच्या मार्फत जनहित याचीका दाखल केली होती.एकनाथवाडीचे ग्रामस्थ बाबा सानप यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २६ एप्रिल रोजी न्यायाधीश एस.एम.गव्हाणे तसेच न्यायाधीश एस.एस.शिंदे यांच्या समोर सुनावणी झाली. जिल्हाधिकारी तसेच जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकनाथवाडी गैरव्यहार प्रकरणी शासकीय सेवेत असलेल्या दोषींवर सहा महिन्यात खातेनिहाय चौकशी पूर्ण करून कारवाई करणार असल्याबाबत शपथपत्र यापूर्वीच उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्याच अनुषंगाने उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोटाळ्यातील शासकीय सेवेत असलेल्या दोषींवर खातेनिहाय चौकशी करून सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकनाथवाडी येथील सुमारे ६१ लाख रुपयाच्या रोहयो गैरव्यवहारातील दोषी असल्याचा ठपका असलेला मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर याच्यासह इतर दोषीवर फौजदारी कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.एकनाथवाडी येथे रोहयो अंतर्गत झालेल्या रोपवाटिका, शेततलाव, रस्ते, वृक्षलागवड या कामांमध्ये मयत मजूर कामावर दाखवून पोस्टात बनावट खाते उघडून मजुरीचे लाखो रुपये हडप करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी