शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील रास्तारोको सुरूच : आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम : पालकमंत्री फिरकलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 18:59 IST

कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणा-या तौसिफ हमीम शेख यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला.

कर्जतमधील रास्तारोको सुरूच : आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम : पालकमंत्री फिरकलेच नाहीतकर्जत : कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणा-या तौसिफ हमीम शेख यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांना कर्जतमध्ये सकाळी ११ वाजता सुरु केलेला रास्तारोको अजूनही सुरुच आहे.  शेख यांचा मृतदेह कर्जतमध्ये आणण्यात आला आहे. परंतु संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून पुर्णपणे अतिक्रमणे काढण्याच्या भुमिकेवर ते  ठाम आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना व अप्पर पोलीस अधीक्षक  मनीष कलवानिया दाखल झाले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील घटना असूनही ते अद्याप कर्जतकडे फिरकलेच नाहीत. पालकमंत्री राम शिंदे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा. शहीद तौसीफ शेख याला न्याय मिळावा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस अधीक्षक आणि तालुका प्रशासन यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. कुटुंबियासाठी १ कोटी रूपयांची मदत आणि नातेवाईकाला सरकारी नोकरी देण्यात यावी. दावल मलिक ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत सर्व अतिक्रमण तात्काळ काढावे. मागण्यांबाबत ठोस  कारवाई होइपर्यंत शहीद तौसीफ शेख यांचे दफन करण्यात येणार नाही, अशी एकमुखी मागणी रास्तारोको आंदोलनादरम्यान करण्यात आली असून अजूनही रास्ता-रोको आंदोलन सुरुच आहे. कर्जत शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी काल दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते. शेख हे ८० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अद्यापही पालकमंत्री राम शिंदे फिरकलेच नाहीत..जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील ही घटना असूनही अद्यापपर्यत त्यांनी घटनास्थळी धाव घेतलेली नाही. सकाळपासून आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असूनही प्रशासनानेही दखल घेतलेली नाही. 

अतिक्रमणे हटविली नावापुरतीच...सकाळी सुरु झालेल्या रास्तारोकोेनंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. ५० टक्के अतिक्रमणे प्रशासनाने हटविली. मात्र पक्की बांधकामे हटविण्यास प्रशासन धजावले नाही. हे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनावर दबाव असल्याचे बोलले जात आहे. सर्व अतिक्रमणे जोपर्यत हटविण्यात येत नाहीत, तोपर्यत रास्तारोको सुरुच ठेवण्याच्या भुमिकेवर आंदोलक ठाम आहेत.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत