शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नद्या फुल्लं, शेतं मात्र कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:02 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, मात्र दुसरीकडे जिल्हा कोरडाच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात विरोधाभासी चित्र : शेजारील जिल्ह्यांच्या पावसावर नद्या वाहत्यादक्षिणेतील धरणे रिकामीच, खरिपाचे उत्पादन घटणार

अहमदनगर : जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, मात्र दुसरीकडे जिल्हा कोरडाच आहे. जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, एकीकडे जिल्ह्यातील नद्या भरलेल्या, मात्र शेतं कोरडीच असे विरोधाभासी चित्र दिसत आहे.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरी ५०० मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणे भरली, नद्या दुथडी भरून वाहिल्या, याशिवाय गावागावातील लहान मोठे पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले, नालाबंडिंग फुल्लं झाले. या पावसाने विहिरींच्या पाणीपातळीतही कमालीची वाढ झाली. त्यामुळे शेतकºयांनी खरिपासह रब्बीचीही भरघोस पिके काढली. शेतीउत्पन्नातही वाढ झाली. हे पाणी मे, जूनपर्यंत टिकले.यंदा मात्र जूनच्या प्रारंभीच पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्या. जूनअखेर झालेल्या तुरळक पावसावर काही भागात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, भूईमूग, कपाशीच्या पेरणी झाल्या. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. पिकांना आवश्यक असणारा दुसरा पाऊस जुलैच्या मध्यावर हवा असताना पडला नाही. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके सुकू लागली. आॅगस्ट उजाडला तरी पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली. थेट १६ आॅगस्टला दोन दिवस झालेल्या भीज पावसावर या पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. मात्र वाढ खुंटलेलीच राहिली. त्यामुळे या पावसाचा पाहिजे तितका फायदा पिकांना होणार नाही. दरम्यान, पावसाचे सुरूवातीचे अडिच महिने कोरडे गेल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. गावोगावचे पाझर तलाव उपसले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.दुसरीकडे पुणे, नाशिक या नगर जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणे ओव्हफ्लो झाली. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी त्यांनी नदीपात्रात सोडले. या नद्या नगर जिल्ह्यातून वाहत असल्यामुळे केवळ नदीलाच पाणी दिसत आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज, येडगाव ही धरणे भरल्याने भीमा नदीपात्रात ६० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भिमेला पूर आला. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील धरणे भरल्याने नांदूर-मध्यमेश्वर बंधाºयातून २० हजार क्युसेक वेगाने पाणी सुरू असून, गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. बाहेरील जिल्ह्यांच्या पावसावर या नद्या वाहत्या झाल्या असल्या तरी नदीकाठची गावे सोडली तर इतर ठिकाणी पाणीपातळी खालावलेली आहे.अकोल्यातील पावसाने ३२ टीएमसी नवे पाणीजिल्ह्यातील चौदापैकी केवळ अकोले तालुक्यात आतापर्यंत दमदार (५०० मिमी) पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात १७ टीएमसी नवे पाणी आले. त्यातील ३ टीएमसी पाणी आवर्तनापोटी खर्च झाले असून सध्या धरणसाठा १९ टीएमसी (७२ टक्के) आहे. त्यानंतर अकोल्यातील भंडारदरा धरणात यंदा ८ टीएमसी नवीन पाणी येऊन हे धरण पंधरा दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाले. त्यातून निळवंडे धरणात आतापर्यंत ७ टीएमसी पाणी सोडले आहे. असे एकूण ३२ टीएमसी नवीन पाणी एकट्या अकोले तालुक्यातील पावसाने जिल्ह्याला मिळाले आहे.इतर १३ तालुके पावसाच्या प्रतीक्षेतअकोले वगळता एकाही तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडलेली नाही. संगमनेर (८७ टक्के) व श्रीरामपूर (८५) या तालुक्यांत समाधानकारक पाऊस असला, तरी कोपरगाव (६८), राहुरी (५५), नेवासा (४४), राहाता (६१), पाथर्डी (५१),शेवगाव (६९),जामखेड (५८) पारनेर (४८), श्रीगोंदा (४४), कर्जत (२७), नगर (४०) हे तालुके मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दक्षिणेतील सीना, खैरी, मांडओहळ आदी प्रकल्पांत २५ टक्केही साठा नाही. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयKopargaonकोपरगावSangamnerसंगमनेरrahaataराहाताShrigondaश्रीगोंदा