शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नद्या फुल्लं, शेतं मात्र कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 17:02 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, मात्र दुसरीकडे जिल्हा कोरडाच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात विरोधाभासी चित्र : शेजारील जिल्ह्यांच्या पावसावर नद्या वाहत्यादक्षिणेतील धरणे रिकामीच, खरिपाचे उत्पादन घटणार

अहमदनगर : जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, मात्र दुसरीकडे जिल्हा कोरडाच आहे. जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, एकीकडे जिल्ह्यातील नद्या भरलेल्या, मात्र शेतं कोरडीच असे विरोधाभासी चित्र दिसत आहे.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरी ५०० मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणे भरली, नद्या दुथडी भरून वाहिल्या, याशिवाय गावागावातील लहान मोठे पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले, नालाबंडिंग फुल्लं झाले. या पावसाने विहिरींच्या पाणीपातळीतही कमालीची वाढ झाली. त्यामुळे शेतकºयांनी खरिपासह रब्बीचीही भरघोस पिके काढली. शेतीउत्पन्नातही वाढ झाली. हे पाणी मे, जूनपर्यंत टिकले.यंदा मात्र जूनच्या प्रारंभीच पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्या. जूनअखेर झालेल्या तुरळक पावसावर काही भागात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, भूईमूग, कपाशीच्या पेरणी झाल्या. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. पिकांना आवश्यक असणारा दुसरा पाऊस जुलैच्या मध्यावर हवा असताना पडला नाही. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके सुकू लागली. आॅगस्ट उजाडला तरी पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली. थेट १६ आॅगस्टला दोन दिवस झालेल्या भीज पावसावर या पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. मात्र वाढ खुंटलेलीच राहिली. त्यामुळे या पावसाचा पाहिजे तितका फायदा पिकांना होणार नाही. दरम्यान, पावसाचे सुरूवातीचे अडिच महिने कोरडे गेल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. गावोगावचे पाझर तलाव उपसले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.दुसरीकडे पुणे, नाशिक या नगर जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणे ओव्हफ्लो झाली. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी त्यांनी नदीपात्रात सोडले. या नद्या नगर जिल्ह्यातून वाहत असल्यामुळे केवळ नदीलाच पाणी दिसत आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज, येडगाव ही धरणे भरल्याने भीमा नदीपात्रात ६० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भिमेला पूर आला. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील धरणे भरल्याने नांदूर-मध्यमेश्वर बंधाºयातून २० हजार क्युसेक वेगाने पाणी सुरू असून, गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. बाहेरील जिल्ह्यांच्या पावसावर या नद्या वाहत्या झाल्या असल्या तरी नदीकाठची गावे सोडली तर इतर ठिकाणी पाणीपातळी खालावलेली आहे.अकोल्यातील पावसाने ३२ टीएमसी नवे पाणीजिल्ह्यातील चौदापैकी केवळ अकोले तालुक्यात आतापर्यंत दमदार (५०० मिमी) पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात १७ टीएमसी नवे पाणी आले. त्यातील ३ टीएमसी पाणी आवर्तनापोटी खर्च झाले असून सध्या धरणसाठा १९ टीएमसी (७२ टक्के) आहे. त्यानंतर अकोल्यातील भंडारदरा धरणात यंदा ८ टीएमसी नवीन पाणी येऊन हे धरण पंधरा दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाले. त्यातून निळवंडे धरणात आतापर्यंत ७ टीएमसी पाणी सोडले आहे. असे एकूण ३२ टीएमसी नवीन पाणी एकट्या अकोले तालुक्यातील पावसाने जिल्ह्याला मिळाले आहे.इतर १३ तालुके पावसाच्या प्रतीक्षेतअकोले वगळता एकाही तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडलेली नाही. संगमनेर (८७ टक्के) व श्रीरामपूर (८५) या तालुक्यांत समाधानकारक पाऊस असला, तरी कोपरगाव (६८), राहुरी (५५), नेवासा (४४), राहाता (६१), पाथर्डी (५१),शेवगाव (६९),जामखेड (५८) पारनेर (४८), श्रीगोंदा (४४), कर्जत (२७), नगर (४०) हे तालुके मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दक्षिणेतील सीना, खैरी, मांडओहळ आदी प्रकल्पांत २५ टक्केही साठा नाही. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयKopargaonकोपरगावSangamnerसंगमनेरrahaataराहाताShrigondaश्रीगोंदा