शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिकलेला माल डोळ्यादेखत शेतातच सडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधांमुळे शेतात मजूर कामाला येत नाहीत. त्यामुळे माल काढता येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी : सततचा लॉकडाऊन व कडक निर्बंधांमुळे शेतात मजूर कामाला येत नाहीत. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही. बाजारात तो नेलाच, तर पोलीस विकण्यासाठी बसू देतील की नाही आणि बसू दिले तर तो विकला जाईल, याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सडण्यासाठी सोडून द्यावा लागत आहे.

३१ मे पर्यंत बाजार समित्या बंद ठेवण्याच्या निर्णयाने शेती आणि शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. पिकलेला माल शेतात कुजविण्यासाठी जिवाचे रान केले का, हा एकच प्रश्न शेतकऱ्यांच्या काळजाला आता वेदना देत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करतो. मागील खरिपात झालेला अतिपाऊस व त्यामुळे मका, सोयाबीन, कपाशी, डाळिंब, कांदा यासारख्या पिकांवर आलेले रोग, घटलेले उत्पादन, पडलेले बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला फार काही लागले नाही.

कमी कालावधीचे पीक घेऊन दोन पैसे हातात येतील या एकाच आशेवर कर्जबाजारी होऊन गहू, कांदे, टोमॅटो, टरबूज, खरबूज, काकडी, कोथिंबीर, भाजीपाला अशी पिके लावली. मात्र, गहू व कांदा सोडला तर बाकी पिके ही रोजच्या रोज काढून बाजारात विक्रीसाठी न्यावी लागतात. अन्यथा ती खराब होतात; पण लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे पोलीस रस्त्यावर बसू देईना आणि बसू दिले तर गिऱ्हाईक मोकळ्या मनाने येईनात, अशी परिस्थिती शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे.

साधारणपणे मार्चपासून टरबूज बाजारात येतात. मात्र, ऐन टरबूज काढण्याच्या वेळीच शासनाकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे व्यापारी माल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हा माल शेतातच सडून गेला. शेतकऱ्यांना आपला माल विक्रीअभावी फेकून द्यावा लागला. ओलीत व ठिंबक सिंचनाद्वारे राहाता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाबरोबर फळभाज्यांची लागवड केली. मात्र, आधी ९ महिन्यांपासून गावोगावचे बंद असलेले आठवडी बाजार आणि आता बाजार समित्या बंद यामुळे शेती मोडून पडली आहे.

..................

फळभाज्या बेभाव.....

संचारबंदीमुळे फळ, भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काकडी, टोमॅटो, वांगी भाजीपाला याही पिकांची दैनावस्था आहे. लग्नाचा सीझन डोळ्यासमोर ठेवून मोठ्या आशेने लावलेली फुलविलेली ही पिके सोडून देताना शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे पीक शेतात तयार आहे; पण बाजारात पाहिजे तसा भाव नाही. ग्राहक नाही ही मोठी शोकांतिका आहे.

..................

गव्हाला नाही भाव

एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत शेतकऱ्यांनी गव्हाची सोंगणी केली; पण वाहतूक सेवा बंद असल्याने यंदा इतरत्र नेण्यास लॉकडाऊनमुळे अडचणी येत आहेत. परिणामी गव्हाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लॉकडाऊनचे संकट डोक्यावर असताना अवकाळी पावसाने अधिकच चिंतेत भर टाकली. ज्या गव्हाला किमान दोन हजार ते २२०० रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता, तिथे आजघडीला १५०० रुपये प्रतिक्विंटल मागितला जात आहे.

................

संकटातही काढला मार्ग

लॉकडाऊननंतर शेतातला माल विकण्यासाठी काही शेतकरी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत ते स्वत: भाजीपाला आणि फळं विकत आहेत. एक दिवस मी धडा केला. टू व्हीलरवर एक कॅरेट खरबूज ठेवले आणि शेजारच्या गावात विकायला गेलो. माल कुणी घेईल की नाही याची मनात धाकधूक होती; पण तासाभरातच सगळे खरबूज विकले. दुसऱ्या दिवसापासून मग मी ट्रॅक्टर भरून खरबूज घेऊन जायला सुरुवात केली. सकाळी ८ ते १२ च्या दरम्यान सगळी विकून यायचो. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातलं अंतर कमी झालं की नफा चांगला मिळतो. अवघ्या तीस गुंठ्यातील खरबुजांमधून तब्बल सव्वालाख रुपयांहून अधिक कमाई केली.

-मनोज अरुण घोगरे, लोणी खुर्द.