शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा-मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:36 IST

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला.

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला. दुबार पेरणीचे संकट सध्या टळले असले तरी शेतकºयांना आषाढाच्या जोरदार सरींची आस लागली आहे. भंडारदरा धरणात यंदा केवळ साडेसात टक्के नवे पाणी आले असून आजमितीस २६ टक्के जलसाठा आहे. 

यावर्षी २९ जून २०२०ला घाटघर येथे अवघा १६ तर पांजर येथे १५ मिलीमीटर पाऊस झाला. गत वर्षी २९ जून २०१९ ला जिल्ह्याची चेरापुंजी घाटघर येथे ११५ मिलीमीटर म्हणजे पावणेपाच इंच पाऊस पडल्याची नोंद होती. यंदा मात्र पावसाच्या आगारातच पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक आदिवासी शेतकºयांची चिंता वाढली आहे.तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगर-शिखरांशी ढगांची झुंबी होत मान्सून सक्रिय होण्याची वाट शेतकरी पाहत आहे. जोराचा पाऊस आला तरच तरारलेल्या भात रोपांची आवणी सुरु होईल. 

भंडारदरा धरणात सोमवारी नव्या २३ तर  १ जून २०२० पासून ८३४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. मात्र वीजनिर्मिती चालू प्रकल्प असल्याने भंडारदरा धरणातून ८१९ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडले जात आहे. १९८ दलघफू क्षमतेचा आंबीत लघु पाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तालुक्यातील इतर तेरा छोटे लघुपाटबंधारे प्रकल्प मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुळानदी वाहती होत पिंपळगावखांड प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली, मात्र ती अल्प आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यात शुक्रवारी २५ तारखेला अकोले शहर परिसरात ६६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. वातावरणातील उकाडा वाढला आणि आकाशात ढग जमा होताना दिसत आहेत, पण पाऊस बरसत नाही अशी स्थिती होती. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. भाताची रोपे तरारली असून भातशेती मशागतीलाही काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.  भंडारदरा धरणात २ हजार ८५० दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ३ हजार ९२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आजमितीस आहे. १ हजार ६० दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात ३८० पाणीसाठा आहे. मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा ७ हजार ३३४ दलघफू असून यंदा केवळ ५१२ दलघफू नव्या पाण्याची आवक आतापर्यंत झाली आहे. पाऊस सुरु होताच तालुक्यातील रस्त्यांमधील खड्ड्यांची तोंड उसवू लागली आहेत. अकोले परिसरात खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने गाळ राबडीतून गाड्यांना वाट काढावी लागत आहे.