शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: दिवसभर रिक्षा चालवून हातात कसेबसे चारशे ते पाचशे रुपये पडतात. महिन्याकाठी दहा ते बारा हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: दिवसभर रिक्षा चालवून हातात कसेबसे चारशे ते पाचशे रुपये पडतात. महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपये एवढीच कमाई. या पैशांतून दैनंदिन उपजीविका, घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि आजारपणाचा खर्च भागवावा लागतो. कुटुंब चालविताना जीव मेटाकुटीस येतो, अशी व्यथा नगर शहरातील रिक्षाचालकांनी मांडली.

परमीट खुले झाल्याने एकट्या नगर शहरात साडेसात हजारपेक्षा जास्त रिक्षा आहेत. गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने महागाई वाढली आहे. नगर शहरातील ९५ टक्के रिक्षा एलपीजी गॅसवर चालतात. या गॅसचेही दर वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले आहे. उदरनिर्वाहासाठी अनेक रिक्षाचालक पार्टटाइम नोकरी करत आहेत. वाहतूक नियमानुसार रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी घेता येत नाहीत. शहरातील बहुतांशी रस्ते खराब असल्याने ॲव्हरेज मिळत नाही. रिक्षा खराब झाली तर त्या खर्चाचा भार वेगळाच. अशी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

------------------------------

पाच रुपयांसाठी भांडणे

प्रवासी रिक्षात बसतात तेव्हा बहुतांशी जण प्रवासभाड्यासाठी वाद करतात. पाच-पाच रुपयांसाठी भांडण करतात. प्रवाशांची संख्या घटल्याने अनेकदा ॲडजेस करून व्यवसाय करावा लागतो. तीनपेक्षा जास्त प्रवासी घेतले तर पोलीस दंड करतात. त्याचाही खर्च वाढत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले.

-----------------------------

नगरमध्ये प्रवाशांसाठी बसची व्यवस्था असल्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. लॉकडाऊनकाळात रिक्षा बंद होत्या. त्यामुळे रिक्षाचालकांची मोठी आर्थिक अडचण झाली. दिवसभर रिक्षा चालवूनही अपेक्षित पैसे मिळत नाहीत. त्यामुळे मी एमआयडीसीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. ती ड्युटी संपल्यानंतर रात्री रिक्षा चालवितो. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने रिक्षाचालकांसाठी सुविधा देणे गरजेचे आहे.

- हरीश डोळसे, रिक्षाचालक .

--------------------------------

लॉकडाऊननंतर कशाबशा रिक्षा सुरू झाल्या. दिवसभर आणि रात्री काही वेळ रिक्षा चालविल्यानंतर कशीबशी राेजंदारी निघते. महागाई वाढल्याने या पैशातून कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण जाते. त्यातच रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे सर्वच रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले आहे.

- गणेश पाचारणे, रिक्षाचालक

....................................

फोटो १३ रिक्षा १, २