शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: दिवसभर रिक्षा चालवून हातात कसेबसे चारशे ते पाचशे रुपये पडतात. महिन्याकाठी दहा ते बारा हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: दिवसभर रिक्षा चालवून हातात कसेबसे चारशे ते पाचशे रुपये पडतात. महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपये एवढीच कमाई. या पैशांतून दैनंदिन उपजीविका, घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि आजारपणाचा खर्च भागवावा लागतो. कुटुंब चालविताना जीव मेटाकुटीस येतो, अशी व्यथा नगर शहरातील रिक्षाचालकांनी मांडली.

परमीट खुले झाल्याने एकट्या नगर शहरात साडेसात हजारपेक्षा जास्त रिक्षा आहेत. गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने महागाई वाढली आहे. नगर शहरातील ९५ टक्के रिक्षा एलपीजी गॅसवर चालतात. या गॅसचेही दर वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले आहे. उदरनिर्वाहासाठी अनेक रिक्षाचालक पार्टटाइम नोकरी करत आहेत. वाहतूक नियमानुसार रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी घेता येत नाहीत. शहरातील बहुतांशी रस्ते खराब असल्याने ॲव्हरेज मिळत नाही. रिक्षा खराब झाली तर त्या खर्चाचा भार वेगळाच. अशी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

------------------------------

पाच रुपयांसाठी भांडणे

प्रवासी रिक्षात बसतात तेव्हा बहुतांशी जण प्रवासभाड्यासाठी वाद करतात. पाच-पाच रुपयांसाठी भांडण करतात. प्रवाशांची संख्या घटल्याने अनेकदा ॲडजेस करून व्यवसाय करावा लागतो. तीनपेक्षा जास्त प्रवासी घेतले तर पोलीस दंड करतात. त्याचाही खर्च वाढत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले.

-----------------------------

नगरमध्ये प्रवाशांसाठी बसची व्यवस्था असल्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. लॉकडाऊनकाळात रिक्षा बंद होत्या. त्यामुळे रिक्षाचालकांची मोठी आर्थिक अडचण झाली. दिवसभर रिक्षा चालवूनही अपेक्षित पैसे मिळत नाहीत. त्यामुळे मी एमआयडीसीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो. ती ड्युटी संपल्यानंतर रात्री रिक्षा चालवितो. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शासनाने रिक्षाचालकांसाठी सुविधा देणे गरजेचे आहे.

- हरीश डोळसे, रिक्षाचालक .

--------------------------------

लॉकडाऊननंतर कशाबशा रिक्षा सुरू झाल्या. दिवसभर आणि रात्री काही वेळ रिक्षा चालविल्यानंतर कशीबशी राेजंदारी निघते. महागाई वाढल्याने या पैशातून कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण जाते. त्यातच रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे सर्वच रिक्षाचालकांचे अर्थचक्र बिघडले आहे.

- गणेश पाचारणे, रिक्षाचालक

....................................

फोटो १३ रिक्षा १, २