शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

राष्ट्रीय स्मारकाच्या घोषणाबाजीतच ‘क्रांती’

By admin | Updated: August 9, 2014 00:22 IST

योगेश गुंड अहमदनगर किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा हवेत विरली आहे.

योगेश गुंड अहमदनगरआॅगस्ट १९४२ च्या क्रांतिमुळे राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळवलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण तर रखडलेच पण या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा हवेत विरली आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्यांना स्थानबद्ध केल्याने या किल्ल्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात करण्याबाबत शासन दरबारी फक्त घोषणांचीच क्रांती सुरू आहे.९ आॅगस्ट १९४२ रोजी झालेल्या आॅगस्ट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांना अटक करून नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात जवळपास साडेतीन वर्षे स्थानबद्ध करण्यात आले होते. याच काळात पंडितजींचा ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ शब्दबद्ध झाला. यादृष्टीने हा किल्ला एका अमोल ग्रंथाची पवित्र भूमी ठरला. पंतप्रधान झाल्यानंतरही पंडितजींनी दोनदा या किल्ल्याला भेट देऊन आपल्या स्थानबद्धतेच्या काळातील आठवणींना उजाळा दिला होता. ज्या खोल्यांमध्ये या राष्ट्रीय नेत्यांना बंदिवासात ठेवण्यात आले होते, त्या खोल्यांचे जतन ७२ वर्षांनंतरही कायम आहे. केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच नव्हे तर इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी या किल्ल्याचे महत्त्व अनन्य साधारण असल्याने हा किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावा, अशी नगरकरांची अनेक वर्षांची मागणी आहे.किल्ल्याला भेट देणाऱ्या राजकीय नेत्यांकडून राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाची फक्त घोषणाबाजी होते. केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी मागील महिन्यात या किल्ल्याला भेट देऊन किल्ला परिसरात फेरफटका मारला. यावेळी त्यांनीही या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हा किल्ला राष्ट्रीय दर्जाचे स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वीही आलेल्या नेत्यांकडून अशीच आश्वासनांची खैरात झाली, मात्र किल्ल्याचे भाग्य काही उजळायला तयार नाही. ११०० कोटींचा आराखडा कागदावरचनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी किल्ल्याच्या विकासासाठी व इतर ऐतिहासिक वास्तुंच्या विकासासाठी ११०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. यातून नगरच्या पर्यटन विकासाला चालना मिळवण्याचा उद्देश आहे. मात्र यातील बहुतांशी योजनांसाठी राज्य सरकारचीही आर्थिक मदत लागणार असल्याने या दोन्ही सरकारच्या समन्वयातून हा आराखडा प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल? असा प्रश्न इतिहास प्रेमींना पडला आहे.५०० कोटींच्या आराखड्यात नगरचा नंबर कधी?केंद्र सरकारने ५०० कोटी रुपयांचा पंचवार्षिक पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे. देशभरातील ५० स्थळांचा त्यात समावेश आहे. येत्या वर्षभरात यातील पाच स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. मात्र यात नगरच्या भुईकोट किल्ल्याचा नंबर लागेल का? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.मोदींचीच कृपा हवी४खा.गांधी यांनी किल्ल्याच्या विकासासाठी आराखडा तयार केला तर केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी किल्ल्याच्या राष्ट्रीय दर्जाबाबत प्रस्ताव करू असे आश्वासन दिले. मात्र या दोन्ही प्रकल्पांसाठी आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच सकारात्मक प्रतिसाद हवा आहे.