शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

‘घोड’ चे आवर्तन पुन्हा सुरू : सोळा लाख रूपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:12 IST

श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे शिवारात समाजकंटकांनी ६ फेब्रुवारीस फोडलेला घोड कालव्याची तब्बल २२ दिवसांनी दुरूस्ती पूर्ण झाली आहे.

मढेवडगाव : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे शिवारात समाजकंटकांनी ६ फेब्रुवारीस फोडलेला घोड कालव्याची तब्बल २२ दिवसांनी दुरूस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे आवर्तनाचा मार्ग मोकळा होताच गुरूवारी घोड धरणातून सायंकाळी पुन्हा आवर्तन सोडण्यात आले.घोड धरणाचे आवर्तन सुरू असतानाच काही समाजकंटकांनी चिंभळे शिवारात घोड नदीवरील इनामगाव हद्दीतील नलगे मळ्याजवळील बंधारा भरण्याच्या उद्देशाने घोडचा मुख्य कालवा ६ फेब्रुवारीस रात्री फोडला होता. त्यामुळे जवळपास २० दशलक्ष घनफूट पाण्याची नासाडी झाली. अखेर २२ दिवसांनी कालवा दुरूस्ती झाली. जवळपास १६ लाख रूपये खर्च आला. ही दुरूस्ती सिंचन विभागाच्या यांत्रिकीकरण विभागाने केली.गुन्हा दाखल होऊनही कालवा फोडणारे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत. बेलवंडी पोलिसांनी पंचनामा केला. परंतु पुढे काहीच कारवाई केली नाही. याबाबत त्यांना वारंवार विचारले असता तपास सुरू असल्याचे उत्तर मिळत आहे. उपवितरिका १४,१७,२०,२१ वरील जवळपास १ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांचे भरणे रखडले आहे. त्या शेतकऱ्यांची पाण्याविना बिकट अवस्था झाली आहे. गुरूवारी सायंकाळी घोड धरणात ४७७.४७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी साठा होता. पूर्ण आवर्तनासाठी एक टीएमसी पाणी लागते. त्यामुळे पुढील उन्हाळी आवर्तन संपल्यातच जमा आहे....दुरूस्तीसाठी अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरीसाठी वेळ लागला. राहिलेले अर्धा टीएमसी पाणी एक दोन दिवसात निर्णय घेऊन सोडणार आहे. लाभधारकांनी दुष्काळी परिस्थिती पाहून सहकार्य करावे. राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करू. आवर्तन सुटल्यावर भरारी पथक व पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. - प्रकाश लंकेश्वर, उपविभागीय अधिकारी, घोड पाटबंधारे विभाग क्रमांक २, मढेवडगाव.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर