शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या आवर्तनाने फळबागांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे ...

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले असून फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन येडगाव धरणातून ४० दिवसांचे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समिती बैठकीत झाला होता. सल्लागार समितीच्या निर्णयानुसार कुकडी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान होते. परंतु, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांत ‘माझा कालवा माझी जबाबदारी’ या अभियानातून कालव्यातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता २०० क्युसेकने वाढली. त्यामुळे कुकडीचे पाणी २४९ किलोमीटर म्हणजे करमाळा तालुक्यात गेले. पहिले सात दिवस करमाळ्यास पाणी देण्यात आले. अकरा दिवस कर्जत तालुक्यास पाणी देण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यास नऊ ते दहा दिवस पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार, सध्या श्रीगोंदा तालुक्यात आर्वतन सुरू आहे.

डीवाय बाराच्या टेलच्या शेतकऱ्यांना ११ वर्षांनंतर प्रथमच पाणी मिळाले. १३२ जोडकालव्यांखालील शेतकऱ्यांची भरणी राहू नये, यासाठी विसापूर कालव्यातून काही पाणी सोडले गेले. हे आवर्तन अंतिम टप्प्यात आले. टेल असूनही पाणी मिळाल्याने फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

---

आणखी आवर्तन पाहिजे

कुकडीमधून सोडलेले आवर्तन सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे. ही जमेची बाजू असली तरी मे महिन्यात कुकडीचे पाणी पिण्यासाठी आवर्तन सोडून सर्व २० तलाव भरणे आवश्यक आहे. तरच, कुकडी लाभक्षेत्रातील तहान भागेल व फळबागा जगण्यास मदत होईल. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.

---

कुकडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चोरीच्यावाडीला पाणी नेले. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळाले.

- बाळासाहेब खेतमाळीस, अध्यक्ष, सावता माळी सहकारी पाणीवापर संस्था

---

या आवर्तनाचे नियोजन चांगले झाले आहे. हे नाकारता येणार नाही. मात्र, मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी तलावात पाणी सोडणे आवश्यक आहे. तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. अन्यथा, परिस्थिती अवघड होईल.

-शिवप्रसाद उबाळे,

सरपंच, आढळगाव

--

०७ कुकडी

श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्यातून सुरू असलेले आवर्तन.