शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या आवर्तनाने फळबागांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे ...

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले असून फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन येडगाव धरणातून ४० दिवसांचे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समिती बैठकीत झाला होता. सल्लागार समितीच्या निर्णयानुसार कुकडी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान होते. परंतु, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांत ‘माझा कालवा माझी जबाबदारी’ या अभियानातून कालव्यातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता २०० क्युसेकने वाढली. त्यामुळे कुकडीचे पाणी २४९ किलोमीटर म्हणजे करमाळा तालुक्यात गेले. पहिले सात दिवस करमाळ्यास पाणी देण्यात आले. अकरा दिवस कर्जत तालुक्यास पाणी देण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यास नऊ ते दहा दिवस पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार, सध्या श्रीगोंदा तालुक्यात आर्वतन सुरू आहे.

डीवाय बाराच्या टेलच्या शेतकऱ्यांना ११ वर्षांनंतर प्रथमच पाणी मिळाले. १३२ जोडकालव्यांखालील शेतकऱ्यांची भरणी राहू नये, यासाठी विसापूर कालव्यातून काही पाणी सोडले गेले. हे आवर्तन अंतिम टप्प्यात आले. टेल असूनही पाणी मिळाल्याने फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

---

आणखी आवर्तन पाहिजे

कुकडीमधून सोडलेले आवर्तन सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे. ही जमेची बाजू असली तरी मे महिन्यात कुकडीचे पाणी पिण्यासाठी आवर्तन सोडून सर्व २० तलाव भरणे आवश्यक आहे. तरच, कुकडी लाभक्षेत्रातील तहान भागेल व फळबागा जगण्यास मदत होईल. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.

---

कुकडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चोरीच्यावाडीला पाणी नेले. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळाले.

- बाळासाहेब खेतमाळीस, अध्यक्ष, सावता माळी सहकारी पाणीवापर संस्था

---

या आवर्तनाचे नियोजन चांगले झाले आहे. हे नाकारता येणार नाही. मात्र, मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी तलावात पाणी सोडणे आवश्यक आहे. तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. अन्यथा, परिस्थिती अवघड होईल.

-शिवप्रसाद उबाळे,

सरपंच, आढळगाव

--

०७ कुकडी

श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्यातून सुरू असलेले आवर्तन.