शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

कुकडीच्या आवर्तनाने फळबागांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे ...

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले असून फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन येडगाव धरणातून ४० दिवसांचे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समिती बैठकीत झाला होता. सल्लागार समितीच्या निर्णयानुसार कुकडी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान होते. परंतु, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांत ‘माझा कालवा माझी जबाबदारी’ या अभियानातून कालव्यातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता २०० क्युसेकने वाढली. त्यामुळे कुकडीचे पाणी २४९ किलोमीटर म्हणजे करमाळा तालुक्यात गेले. पहिले सात दिवस करमाळ्यास पाणी देण्यात आले. अकरा दिवस कर्जत तालुक्यास पाणी देण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यास नऊ ते दहा दिवस पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार, सध्या श्रीगोंदा तालुक्यात आर्वतन सुरू आहे.

डीवाय बाराच्या टेलच्या शेतकऱ्यांना ११ वर्षांनंतर प्रथमच पाणी मिळाले. १३२ जोडकालव्यांखालील शेतकऱ्यांची भरणी राहू नये, यासाठी विसापूर कालव्यातून काही पाणी सोडले गेले. हे आवर्तन अंतिम टप्प्यात आले. टेल असूनही पाणी मिळाल्याने फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

---

आणखी आवर्तन पाहिजे

कुकडीमधून सोडलेले आवर्तन सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे. ही जमेची बाजू असली तरी मे महिन्यात कुकडीचे पाणी पिण्यासाठी आवर्तन सोडून सर्व २० तलाव भरणे आवश्यक आहे. तरच, कुकडी लाभक्षेत्रातील तहान भागेल व फळबागा जगण्यास मदत होईल. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.

---

कुकडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चोरीच्यावाडीला पाणी नेले. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळाले.

- बाळासाहेब खेतमाळीस, अध्यक्ष, सावता माळी सहकारी पाणीवापर संस्था

---

या आवर्तनाचे नियोजन चांगले झाले आहे. हे नाकारता येणार नाही. मात्र, मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी तलावात पाणी सोडणे आवश्यक आहे. तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. अन्यथा, परिस्थिती अवघड होईल.

-शिवप्रसाद उबाळे,

सरपंच, आढळगाव

--

०७ कुकडी

श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्यातून सुरू असलेले आवर्तन.