शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

कुकडीच्या आवर्तनाने फळबागांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे ...

श्रीगोंदा : कुकडीचे शेती सिंचनासाठी सोडलेले ४० दिवसांचे आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. कुकडीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पाणीवाटपाचे व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे कमी कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले असून फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

कुकडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन येडगाव धरणातून ४० दिवसांचे आवर्तन देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समिती बैठकीत झाला होता. सल्लागार समितीच्या निर्णयानुसार कुकडी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी देणे अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान होते. परंतु, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांत ‘माझा कालवा माझी जबाबदारी’ या अभियानातून कालव्यातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता २०० क्युसेकने वाढली. त्यामुळे कुकडीचे पाणी २४९ किलोमीटर म्हणजे करमाळा तालुक्यात गेले. पहिले सात दिवस करमाळ्यास पाणी देण्यात आले. अकरा दिवस कर्जत तालुक्यास पाणी देण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यास नऊ ते दहा दिवस पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार, सध्या श्रीगोंदा तालुक्यात आर्वतन सुरू आहे.

डीवाय बाराच्या टेलच्या शेतकऱ्यांना ११ वर्षांनंतर प्रथमच पाणी मिळाले. १३२ जोडकालव्यांखालील शेतकऱ्यांची भरणी राहू नये, यासाठी विसापूर कालव्यातून काही पाणी सोडले गेले. हे आवर्तन अंतिम टप्प्यात आले. टेल असूनही पाणी मिळाल्याने फळबागांना संजीवनी मिळाली आहे.

---

आणखी आवर्तन पाहिजे

कुकडीमधून सोडलेले आवर्तन सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहे. ही जमेची बाजू असली तरी मे महिन्यात कुकडीचे पाणी पिण्यासाठी आवर्तन सोडून सर्व २० तलाव भरणे आवश्यक आहे. तरच, कुकडी लाभक्षेत्रातील तहान भागेल व फळबागा जगण्यास मदत होईल. अन्यथा, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.

---

कुकडीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला चोरीच्यावाडीला पाणी नेले. त्यामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळाले.

- बाळासाहेब खेतमाळीस, अध्यक्ष, सावता माळी सहकारी पाणीवापर संस्था

---

या आवर्तनाचे नियोजन चांगले झाले आहे. हे नाकारता येणार नाही. मात्र, मे महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी तलावात पाणी सोडणे आवश्यक आहे. तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. अन्यथा, परिस्थिती अवघड होईल.

-शिवप्रसाद उबाळे,

सरपंच, आढळगाव

--

०७ कुकडी

श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्यातून सुरू असलेले आवर्तन.