शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:14 IST

चालू वर्षी कमी असलेले पर्जन्यमान व त्यामुळे उद्भवलेली टंचाईची स्थिती यावर मात करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे.

अहमदनगर : चालू वर्षी कमी असलेले पर्जन्यमान व त्यामुळे उद्भवलेली टंचाईची स्थिती यावर मात करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. जिल्ह्यात पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.जिल्ह्यामध्ये सप्टेंबरअखेर पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असल्याने तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची शाश्वती नसल्याने सध्या पाणी टंचाई व जनावरांना चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे चाºयाची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आणीबाणीच्या प्रकरणी संबंधितावर नोटिसा बजावणे शक्य नाही.त्यामुळे जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून चारा वाहतूक करण्यास प्रतिबंध आदेश जारी केला आहे. सदरचा आदेश निर्गमित झाल्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीकरिता अंमलात राहिल, असेही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी एका आदेशान्वये कळविले आहे. या आदेशामुळे जिल्ह्याबाहेर चारा न जाता जिल्ह्यातीच जनावरांसाठी उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर