शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे गत दीड वर्षांपासून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. राज्यभरात निर्बंध शिथिल ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे गत दीड वर्षांपासून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. राज्यभरात निर्बंध शिथिल केल्यानंतर बंद असलेली परिवहन मंडळाची बससेवा साधारण दोन महिन्यांपूर्वी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकाला इच्छित स्थळी पोहोचवणारी लालपरी आता रस्त्यांवर धावू लागली आहे. लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

संगमनेर आगारातून पुणे, औरगांबाद, मालेगाव, मुंबई, चाळीसगाव, बारामती, जालना, गोंदवले, अहमदनगर, नाशिक या लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच कोपरगाव, अकोले, साकूर येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. इतरही आगारांच्या गाड्या संगमनेरात येतात. प्रवासी संख्या वाढत असल्याने बसेसच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात येत आहेत.

-------------

संगमनेरात ३६ बसेसचे कोटिंग पूर्ण

अहमदनगर जिल्ह्यातील ४०० एसटी बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होणार आहे. संगमनेर आगारातील ५३ बसेसला कोटिंग करण्यात येणार असून आतापर्यंत जवळजवळ ३६ बसेसचे कोंटिग पूर्ण झाले आहे. कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांचा धोका यामुळे टळणार आहे. असे संगमनेर आगाराचे प्रमुख नीलेश करंजकर यांनी सांगितले.

---------

बसेसच्या फेऱ्या फेऱ्यांची संख्या

संगमनेर-पुणे ७

संगमनेर-औरंगाबाद ५

संगमनेर-मालेगाव २

संगमनेर-मुंबई ३

संगमनेर-चाळीसगाव १

संगमनेर-बारामती १

संगमनेर-जालना १

संगमनेर-गोंदवले १

संगमनेर-अहमदनगर ६

संगमनेर-नाशिक ४

----------------------------

सर्वसामान्य नागरिकांकडून बसला पसंती

अहमदनगर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधांमुळे अनेकांची जिल्हास्तरावरील शासकीय कार्यालयांमधील असलेली कामे रखडली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून बसला पसंती दिली जाते आहे. तसेच संगमनेरातून बड्या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक आहे.

___

संगमनेर आगारातून बसेसच्या दररोज ११२ फेऱ्या होतात. त्यात लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. बसने प्रवास करण्याला प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे. प्रवाशांनी प्रवास करताना तोंडाला मास्क लावाला, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.

नीलेश करंजकर, आगारप्रमख, संगमनेर

----------------

star 1070star 1070