शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जात वैधतेच्या नव्या निर्णयास आदिवासी आमदारांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 16:35 IST

अकोले: सरकारने रक्ताच्या नात्यातून जात वैधता ठरवण्याचा निर्णय घेतला गेल्यामुळे बोगस घुसखोर आदिवासींना पाठबळ मिळेल. खरे आदिवासी योजनांपासून वंचित राहतील? त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सोळा आमदारांनी केल्याची माहिती आमदार वैभव पिचड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

ठळक मुद्देवैभव पिचड : बोगस आदिवासींना पाठबळ मिळेल

अकोले: सरकारने रक्ताच्या नात्यातून जात वैधता ठरवण्याचा निर्णय घेतला गेल्यामुळे बोगस घुसखोर आदिवासींना पाठबळ मिळेल. खरे आदिवासी योजनांपासून वंचित राहतील? त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सोळा आमदारांनी केल्याची माहिती आमदार वैभव पिचड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ‘बोेगस घुसखोर’आदिवासींना संरक्षण देण्यासाठी सरकारने हा नवा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.ख-या आदिवासींना नोकरी व विकास योजनांपासून वंचित ठेवणा-या बोगस आदिवासींना सरकारने अभय देण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू नये, अन्यथा न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरुन सनदशीर मार्गाने राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा आ.पिचड यांनी दिला. ४ आॅक्टोबर २०१७ ला नागपूर येथे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या बैठकीत रक्ताच्या नात्यातून जात वैधता देण्याबाबतच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयास विरोध दर्शविण्यात आला. समितीचे १६ सदस्य व आदिवासी आयुक्त बैठकीस उपस्थित होते. रक्ताच्या नात्यातून जात वैधता ठरविल्यास आदिवासींमधे घुसखोरी करुन अनुदान,योजना,नोक-या लाटल्या, त्यांना फायदा होईल. आदिवासीच्या चालिरिती,राहणीमान,परंपरा,सण उत्सव,आदिवासी समाजाचे काही स्वत:चे कायदे आहेत. १९५१ पासून बहुतांशी आदिवासींकडे जात वैधता दाखले आहेत. त्यांच्या जमिनीवर आरक्षणाची नोंद आहे. त्यांच्या जमिनी अन्य कुणाला खरेदी करता येत नाहीत. या आधारावर जात वैधता ठरवावी. बोगस आदिवासींना सरंक्षण देण्यासाठी नवा निर्णय सरकारने घेतला की काय? वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी जात वैधता सादर करण्याच्या आदेशानेही अनेक आदिवासी वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित राहणार आहेत. नोकरी, शिक्षण, निवडणूक व न्यायालयाच्या कारणासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्राधान्याने काढता येतात. ती लाखो प्रकरणे प्रलंबित असताना नव्या कारणासाठी कधी जात वैधता प्रमाणपत्र मिळणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे आदिवासी लोक सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. याबाबत सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांची एकत्रीत भेट घेणार आहेत.५० कोटींचा निधी अखर्चिततीन वर्षांपासून आदिवासींसाठी आॅईल इंजिन व पाईप खरेदी झाली नसल्याने ५० कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला. केवळ खरेदीचा ठेका कुणाला द्यायचा? या एकाच कारणासाठी आदिवासींसाठीचे पैसे पुन्हा माघारी जाण्याची शक्यता बळावली आहे. तथाकथित ठेकदार व युतीचे पुढारी आदिवासींच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचून न देणारे झारीतील शुक्राचार्य झाल्याचे आ.पिचड म्हणाले.