शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

जात वैधतेच्या नव्या निर्णयास आदिवासी आमदारांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 16:35 IST

अकोले: सरकारने रक्ताच्या नात्यातून जात वैधता ठरवण्याचा निर्णय घेतला गेल्यामुळे बोगस घुसखोर आदिवासींना पाठबळ मिळेल. खरे आदिवासी योजनांपासून वंचित राहतील? त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सोळा आमदारांनी केल्याची माहिती आमदार वैभव पिचड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

ठळक मुद्देवैभव पिचड : बोगस आदिवासींना पाठबळ मिळेल

अकोले: सरकारने रक्ताच्या नात्यातून जात वैधता ठरवण्याचा निर्णय घेतला गेल्यामुळे बोगस घुसखोर आदिवासींना पाठबळ मिळेल. खरे आदिवासी योजनांपासून वंचित राहतील? त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांसह सोळा आमदारांनी केल्याची माहिती आमदार वैभव पिचड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ‘बोेगस घुसखोर’आदिवासींना संरक्षण देण्यासाठी सरकारने हा नवा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.ख-या आदिवासींना नोकरी व विकास योजनांपासून वंचित ठेवणा-या बोगस आदिवासींना सरकारने अभय देण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू नये, अन्यथा न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरुन सनदशीर मार्गाने राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा आ.पिचड यांनी दिला. ४ आॅक्टोबर २०१७ ला नागपूर येथे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या बैठकीत रक्ताच्या नात्यातून जात वैधता देण्याबाबतच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयास विरोध दर्शविण्यात आला. समितीचे १६ सदस्य व आदिवासी आयुक्त बैठकीस उपस्थित होते. रक्ताच्या नात्यातून जात वैधता ठरविल्यास आदिवासींमधे घुसखोरी करुन अनुदान,योजना,नोक-या लाटल्या, त्यांना फायदा होईल. आदिवासीच्या चालिरिती,राहणीमान,परंपरा,सण उत्सव,आदिवासी समाजाचे काही स्वत:चे कायदे आहेत. १९५१ पासून बहुतांशी आदिवासींकडे जात वैधता दाखले आहेत. त्यांच्या जमिनीवर आरक्षणाची नोंद आहे. त्यांच्या जमिनी अन्य कुणाला खरेदी करता येत नाहीत. या आधारावर जात वैधता ठरवावी. बोगस आदिवासींना सरंक्षण देण्यासाठी नवा निर्णय सरकारने घेतला की काय? वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी जात वैधता सादर करण्याच्या आदेशानेही अनेक आदिवासी वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित राहणार आहेत. नोकरी, शिक्षण, निवडणूक व न्यायालयाच्या कारणासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्राधान्याने काढता येतात. ती लाखो प्रकरणे प्रलंबित असताना नव्या कारणासाठी कधी जात वैधता प्रमाणपत्र मिळणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे आदिवासी लोक सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. याबाबत सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांची एकत्रीत भेट घेणार आहेत.५० कोटींचा निधी अखर्चिततीन वर्षांपासून आदिवासींसाठी आॅईल इंजिन व पाईप खरेदी झाली नसल्याने ५० कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला. केवळ खरेदीचा ठेका कुणाला द्यायचा? या एकाच कारणासाठी आदिवासींसाठीचे पैसे पुन्हा माघारी जाण्याची शक्यता बळावली आहे. तथाकथित ठेकदार व युतीचे पुढारी आदिवासींच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचून न देणारे झारीतील शुक्राचार्य झाल्याचे आ.पिचड म्हणाले.