शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण उपयुक्त पण गुणवत्ताही सिद्ध करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:42 IST

सामाजिक व शैक्षणिक मागासांचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्यातून राज्य शासनाने नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : सामाजिक व शैक्षणिक मागासांचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्यातून राज्य शासनाने नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला आहे़ या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली़ आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तूर्त स्थगिती न देता दिलासा दिला आहे़ मराठा आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश व नोकऱ्यांबाबत मात्र सध्या काही प्रमाणात संभ्रम आहे़ या पार्श्वभूमीवर अ‍ॅड़ शिवाजी कराळे यांच्याशी मराठा आरक्षण या विषयावर ‘लोकमत’ने संवाद साधलाप्रश्न : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर झाला का ?उत्तर : मराठा समाजाची महाराष्ट्रात मोठी लोकसंख्या आहे़ सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या विचार करता या समाजाला खूप आधीपासून आरक्षण मिळणे गरजेचे होते़ प्रत्यक्षात मात्र मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले़प्रश्न : आरक्षणावर अजूनही टांगती तलवार आहे का?उत्तर : शासनाने कायद्याच्या चौकटीत बसवून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे़ उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैधठरवत नोकºयांमध्ये १३ तर शिक्षणामध्ये १२ टक्के असे प्रमाण ठरविले आहे़ या आरक्षणाला सध्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे़ सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षण कायद्यास स्थगिती न देता पुढील दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे़ त्यामुळे आरक्षणावर टांगती तलवार आहे असे म्हणता येणार नाही़प्रश्न : आरक्षणाचा कितपत लाभ होईल ?उत्तर : नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळाल्याने त्या राखीव जागांवर मराठा समाजातील मुलांना संधी मिळणार आहे़ यातून शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे़ मात्र केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता आपली गुणवत्ताही सिद्ध करावी़प्रश्न : आरक्षणातून नोक-या आणि शैक्षणिक प्रवेशाबाबत संभ्रम आहे का?उत्तर : मराठा आरक्षणाचा कायदाच संमत झालेला आहे़ त्यामुळे सरकारी नोकºयांमध्ये आता जागा राखीव राहतील़ शैक्षणिक प्रवेशाबाबतही नियमावली आहे़ या आरक्षणाच्या माध्यमातून आधी दिलेल्या नियुक्त्यांबाबत काही प्रमाणात संभ्रम होऊ शकतो़ त्याबाबत निर्णय होईल़ या पुढील काळात मात्र संभ्रम होण्याचा प्रश्नच नाही़ विद्यार्थी व नोकरीसाठी अर्ज करणाºयांनी नव्याने लागून झालेले मराठा आरक्षण समजून घ्यावे़मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्याने एका मोठ्या सामाजिक संघर्षाला पूर्ण विराम मिळाला आहे़ कायद्याच्या चौकटीतही हे आरक्षण टिकणार आहे़ येणाºया काळात मराठा समाजातील तरुण पिढीला याचा लाभ होणार आहे़ - अ‍ॅड़ शिवाजी कराळे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर