शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

डाळिंबावरील तेल्या रोगावर संशोधन गरजेचे

By admin | Updated: February 3, 2015 17:31 IST

डाळिंबावर तेल्या रोगामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या रोगावर संशोधन करणे गरजेचे हवे असे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

शिर्डी : डाळिंबावर तेल्या रोगामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी राज्याचा कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या रोगावर संशोधन करून ते शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचवावे, असे प्रतिपादन राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शिर्डी येथे केले.कृषी विद्यापीठांसाठी सरकारने दिलेल्या हजारो एकर जमिनी पडिक आहेत. तेथील संशोधनाचा लाभ शेतकर्‍यांना झाला असता तर आत्महत्येचे प्रमाण रोखता आले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. शिर्डी येथे सुरू असलेल्या डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डाळिंब परिसंवाद व प्रदर्शनाचा समारोप सोमवारी लोणीकर यांच्या हस्ते झाला. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राहुल आहेर, प्रदेशाध्यक्ष रविंद्र नवलाखा, उपाध्यक्ष अरुण देवरे, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. हरिहर कौसाडीकर, डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे, फलोत्पादनचे संचालक डॉ. सुदाम अडसूळ, शिर्डीचे उपनगराध्यक्ष निलेश कोते आदींची उपस्थिती होती.आपण स्वत: शेतकरी असल्याने शेतकर्‍यांच्या समस्या आपणास माहीत आहेत. शेतकरी टिकला तरच देशाची प्रगती होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भविष्यकाळात शेती व्यवसायाला संरक्षण व उद्योगाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, असे आवाहन लोणीकर यांनी केले.आगामी काळात राज्य सरकार आणि डाळिंब संशोधन केंद्राशी एकत्रित विचारविनिमय करून डाळिंब उत्पादकांचे प्रश्न सोडवले जातील, अशी ग्वाहीही लोणीकर यांनी दिली.देशातील तीर्थक्षेत्रे स्वच्छ करण्याचा निर्धार नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्या शहरांमध्ये शिर्डीचा अंतर्भाव व्हावा, यासाठी प्रयत्न करू, येथे घनकचर्‍याची समस्या असून घनकचरा प्रकल्पाकरिता केंद्राकडून निधी आणण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आ. कोल्हे म्हणाल्या की, डाळिंब परिसंवादामुळे शेतकर्‍यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. डाळिंब उत्पादकांनी अधिक उत्पन्न मिळवण्याकरता उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन त्याचे मार्केटिंग करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनीही मनोगत व्यक्त केले. संघाचे संचालक खेमराज कोर यांनी प्रास्ताविकात शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. लोणीकर यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)

 ■ देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन विद्यापीठांनी डाळिंबाचे रोगमुक्त नवीन वाण विकसित करावे, डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संरक्षण मिळावे, त्यांना अनुदानावर खत व औषधे मिळावीत, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणण्याचे आश्‍वासन लोणीकर यांनी दिले.