शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...

By admin | Updated: January 27, 2015 12:19 IST

जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी निवडणूक होत आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्या त्या गटात स्थानिक नेते, तालुक्याचे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी निवडणूक होत आहे. या ठिकाणी बुधवार दि.२८ ला मतदान होणार आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्या त्या गटात स्थानिक नेते, तालुक्याचे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यात प्रामुख्याने अकोल्यात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, श्रीगोंद्यात माजी आमदार बबनराव पाचपुते आणि शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा समावेश आहे. पक्षीय पातळीवर या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सदस्य होते. यामुळे त्या जागा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य बळ असणारा पक्ष राष्ट्रवादी होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन गटातील राष्ट्रवादीचे सदस्य आमदार झालेले आहेत. अपवाद वगळता शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सदस्या मोनिका राजळे यांनी भाजपाच्या तिकिटावर राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला. आता या ठिकाणी होणार्‍या निवडणुकीत घुले यांना त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. त्याचा ते कसा लाभ उठवितात, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या गटात सेनेचा उमेदवार तगडा आहे. मात्र, आतापर्यंत ते चार वेळा जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. या गटात चौरंगी लढत होणार असून शिवसेना-भाजपाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. यात राष्ट्रवादीला संधी साधण्यासाठी घुले कशी रणनीती आखतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अकोले तालुक्यात राजूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या पिचड पिता पुत्रा समोर सर्व विरोधक एकत्र आलेले आहे. विरोधकांची एकवटलेली ही राजकीय ताकद भेदण्यात पिचड यशस्वी होतात की नाही, हे निकालानंतर पहावयास मिळणार आहे. यापूर्वी अकोले तालुक्यात पिचड यांच्या विरोधात विरोधक एकत्र आलेले आहेत. मात्र, पिचड यांचा पारंपरिक मतदार असणारा आदिवासी पट्टा नेहमीच त्यांच्या मागे राहिलेला आहे. त्याची पुनरावृत्ती होते की नाही हे निवडणुकीत दिसणार आहे. सर्वाधिक चुरस श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव जिल्हा परिषद गटात निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पाचपुते यांच्यादृष्टीने या गटातील निवडणूक अस्तित्वाची आहे. या निमित्ताने तालुक्यातील राजकारणात आपले वर्चस्व असल्याचे दाखविता येणार आहे. तर जिल्हा परिषदेतून पहिल्या प्रयत्नात विधानसभेत उडी घेणार्‍या आ. राहुल जगताप यांना निवडणुकीत आपला गट राखण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)

■ या तीन गटातील निवडणुकीचा कोणताच परिणाम जिल्हा परिषदेच्या सत्तेवर होणार नाही. मात्र, पक्षीय पातळीवर निवडणुकीला महत्त्व आले आहे. यामुळेच कोळगाव गटात भाजपाने ऐनवेळी उमेदवार बदलला. तशी अवस्था पाथर्डी तालुक्यात असून या ठिकाणी सेना-भाजपा आणि राष्ट्रवादीत चुरस आहे. अटीतटीच्या या लढाईत कोणता नेता बाजी मारतो हे २८ तारखेनंतर सिध्द होणार आहे.