शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...

By admin | Updated: January 27, 2015 12:19 IST

जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी निवडणूक होत आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्या त्या गटात स्थानिक नेते, तालुक्याचे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी निवडणूक होत आहे. या ठिकाणी बुधवार दि.२८ ला मतदान होणार आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार असून त्या त्या गटात स्थानिक नेते, तालुक्याचे आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यात प्रामुख्याने अकोल्यात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, श्रीगोंद्यात माजी आमदार बबनराव पाचपुते आणि शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा समावेश आहे. पक्षीय पातळीवर या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सदस्य होते. यामुळे त्या जागा ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य बळ असणारा पक्ष राष्ट्रवादी होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन गटातील राष्ट्रवादीचे सदस्य आमदार झालेले आहेत. अपवाद वगळता शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सदस्या मोनिका राजळे यांनी भाजपाच्या तिकिटावर राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला. आता या ठिकाणी होणार्‍या निवडणुकीत घुले यांना त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. त्याचा ते कसा लाभ उठवितात, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या गटात सेनेचा उमेदवार तगडा आहे. मात्र, आतापर्यंत ते चार वेळा जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. या गटात चौरंगी लढत होणार असून शिवसेना-भाजपाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. यात राष्ट्रवादीला संधी साधण्यासाठी घुले कशी रणनीती आखतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अकोले तालुक्यात राजूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या पिचड पिता पुत्रा समोर सर्व विरोधक एकत्र आलेले आहे. विरोधकांची एकवटलेली ही राजकीय ताकद भेदण्यात पिचड यशस्वी होतात की नाही, हे निकालानंतर पहावयास मिळणार आहे. यापूर्वी अकोले तालुक्यात पिचड यांच्या विरोधात विरोधक एकत्र आलेले आहेत. मात्र, पिचड यांचा पारंपरिक मतदार असणारा आदिवासी पट्टा नेहमीच त्यांच्या मागे राहिलेला आहे. त्याची पुनरावृत्ती होते की नाही हे निवडणुकीत दिसणार आहे. सर्वाधिक चुरस श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव जिल्हा परिषद गटात निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पाचपुते यांच्यादृष्टीने या गटातील निवडणूक अस्तित्वाची आहे. या निमित्ताने तालुक्यातील राजकारणात आपले वर्चस्व असल्याचे दाखविता येणार आहे. तर जिल्हा परिषदेतून पहिल्या प्रयत्नात विधानसभेत उडी घेणार्‍या आ. राहुल जगताप यांना निवडणुकीत आपला गट राखण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)

■ या तीन गटातील निवडणुकीचा कोणताच परिणाम जिल्हा परिषदेच्या सत्तेवर होणार नाही. मात्र, पक्षीय पातळीवर निवडणुकीला महत्त्व आले आहे. यामुळेच कोळगाव गटात भाजपाने ऐनवेळी उमेदवार बदलला. तशी अवस्था पाथर्डी तालुक्यात असून या ठिकाणी सेना-भाजपा आणि राष्ट्रवादीत चुरस आहे. अटीतटीच्या या लढाईत कोणता नेता बाजी मारतो हे २८ तारखेनंतर सिध्द होणार आहे.