शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

साथजन्य परिस्थिती आटोक्यात आणा

By admin | Updated: October 18, 2014 23:41 IST

अहमदनगर : जिल्ह्यात कोणत्याच भागात साथजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. ज्या ठिकाणी साथ उद्भवली असेल ती आटोक्यात आणावी,

अहमदनगर : जिल्ह्यात कोणत्याच भागात साथजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. ज्या ठिकाणी साथ उद्भवली असेल ती आटोक्यात आणावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिले.शनिवारी आरोग्य समितीच्या बैठकीत शेलार बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.बी. गंडाळ यांनी जिल्ह्यातील साथ परिस्थितीचा आढावा दिला. यात जानेवारीपासून आतापर्यंत ६७१ रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून त्यापैकी १०० जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे सिध्द झाले आहे. सप्टेंबर महिन्यात दहा रुग्णांना मलेरियाची लागण झालेली होती.जिल्ह्यात आतापर्यंत २३ ठिकाणी साथजन्य आजारांचा उद्रेक झाला असून यात ७ ठिकाणी डेंग्यू संशयित, चिकणगुनीया २, हिवताप १ आणि इतर तापाच्या ७ ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सहा डेंग्यू संशयितांचा मृत्यू झाला आहे. चालू महिन्यात सोनई (नेवासा), कोसे गव्हाण (श्रीगोंदा), देडगाव (नेवासा) आणि राळेगण म्हसोबा (नगर) यांचा समावेश आहे. शहरी भागात ७२ ठिकाणी आणि ग्रामीण भागात ८३६ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूचा उद्रेक झालेल्या ६१ गावात यंदा हाय अलर्ट घोषित करण्यात आला असल्याचे गंडाळ यांनी स्पष्ट केले.त्यावर उपाध्यक्ष शेलार यांनी वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच साथजन्य परिस्थिती औषधांसह अन्य साधन सामग्री कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)