शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दोन हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचेच पुनर्गठण

By admin | Updated: June 7, 2016 23:35 IST

अहमदनगर : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत़ मात्र ३१ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचेच पुनर्गठण करण्यात आले

अहमदनगर : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत़ मात्र ३१ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचेच पुनर्गठण करण्यात आले असून, खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना नवीन १ हजार कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ उर्वरित ३६ हजार शेतकऱ्यांचे अद्यापही पुनर्गठण न झाल्याने बँकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी २०१५-१६ च्या पीक कर्जाचे पुनर्गठण करून, शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला़ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा सहकारी बँकांना दिले आहेत़ जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालानुसार२०१५- २०१६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना २०२ कोटीच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते़ त्यापैकी गत ३१ मे पर्यंत २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटीच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे़ उर्वरित ३५ हजार ८०० शेतकऱ्यांचे १९२ कोटीचे पीक कर्ज थकीत आहे़ खरीप व रब्बी पीक वाया गेल्याने शेतकरी हे कर्ज परत करू शकले नाहीत़ त्यामुळे कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी बँकांकडून मात्र शेतकऱ्यांना सहकार्य केले जात नाही़ कर्जाचे पुनर्गठण केल्यास शेतकरी नवीन कर्जास पात्र ठरणार आहेत़खरीप पिकासाठी चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्यातील सर्व बँकांना ३ हजार ८०० कोटीच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ त्यापैकी एक हजार कोटीच्या पीक कर्जाचे वाटप जिल्ह्यातील बँकांकडून करण्यात आले आहे़ उर्वरित २ हजार ८०० कोटीचे कर्ज जून अखेरपर्यंत करण्यात येणार आहे़ पण, थकीत कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी तळाला असल्याने नवीन कर्ज वाटप होणार कसे, असाही प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)पुनर्गठण म्हणजे काय?जून महिना उजाडला आहे़ जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांपैकी अवघ्या २ हजार २०० शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे़ खरीप पीक तोंडावर आले असून, शेतकऱ्यांना सध्या पैशांची गरज आहे़ पुनर्गठण आताच झाले तर त्यांना मागील कर्जाची थकबाकी कायम ठेऊन नवीन कर्ज मिळेल. त्यामुळे उर्वरित ३५ हजार ८०० शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे तत्काळ पुनर्गठण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मध्यंतरी झालेल्या बैठकीत बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत़जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांचे २०२ कोटीचे पीक कर्ज थकीत आहे़ त्यापैकी २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे़ उर्वरित शेतकऱ्यांचे जून अखेरीस पुनर्गठण करण्याचे उद्दिष्ट आहे़ त्यासाठी बँकांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे़ मात्र शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही़ बँका सकारात्मक आहेत़ पण शेतकरी कर्जाचे पुनर्गठण न करता नवे- जुने करत असल्याचे निदर्शनास आले आहे़-आऱ एम़ दायमा, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.