शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
3
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
4
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
5
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
6
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
7
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
8
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
9
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
10
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
11
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
12
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
13
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
15
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
16
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
17
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
18
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
19
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
20
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

केवळ दोन हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचेच पुनर्गठण

By admin | Updated: June 7, 2016 23:35 IST

अहमदनगर : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत़ मात्र ३१ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचेच पुनर्गठण करण्यात आले

अहमदनगर : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत़ मात्र ३१ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचेच पुनर्गठण करण्यात आले असून, खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना नवीन १ हजार कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ उर्वरित ३६ हजार शेतकऱ्यांचे अद्यापही पुनर्गठण न झाल्याने बँकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी २०१५-१६ च्या पीक कर्जाचे पुनर्गठण करून, शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला़ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा सहकारी बँकांना दिले आहेत़ जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालानुसार२०१५- २०१६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांना २०२ कोटीच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते़ त्यापैकी गत ३१ मे पर्यंत २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटीच्या पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे़ उर्वरित ३५ हजार ८०० शेतकऱ्यांचे १९२ कोटीचे पीक कर्ज थकीत आहे़ खरीप व रब्बी पीक वाया गेल्याने शेतकरी हे कर्ज परत करू शकले नाहीत़ त्यामुळे कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी बँकांकडून मात्र शेतकऱ्यांना सहकार्य केले जात नाही़ कर्जाचे पुनर्गठण केल्यास शेतकरी नवीन कर्जास पात्र ठरणार आहेत़खरीप पिकासाठी चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्यातील सर्व बँकांना ३ हजार ८०० कोटीच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ त्यापैकी एक हजार कोटीच्या पीक कर्जाचे वाटप जिल्ह्यातील बँकांकडून करण्यात आले आहे़ उर्वरित २ हजार ८०० कोटीचे कर्ज जून अखेरपर्यंत करण्यात येणार आहे़ पण, थकीत कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी तळाला असल्याने नवीन कर्ज वाटप होणार कसे, असाही प्रश्न आहे़ (प्रतिनिधी)पुनर्गठण म्हणजे काय?जून महिना उजाडला आहे़ जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांपैकी अवघ्या २ हजार २०० शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे़ खरीप पीक तोंडावर आले असून, शेतकऱ्यांना सध्या पैशांची गरज आहे़ पुनर्गठण आताच झाले तर त्यांना मागील कर्जाची थकबाकी कायम ठेऊन नवीन कर्ज मिळेल. त्यामुळे उर्वरित ३५ हजार ८०० शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे तत्काळ पुनर्गठण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मध्यंतरी झालेल्या बैठकीत बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत़जिल्ह्यातील ३८ हजार शेतकऱ्यांचे २०२ कोटीचे पीक कर्ज थकीत आहे़ त्यापैकी २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे़ उर्वरित शेतकऱ्यांचे जून अखेरीस पुनर्गठण करण्याचे उद्दिष्ट आहे़ त्यासाठी बँकांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे़ मात्र शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही़ बँका सकारात्मक आहेत़ पण शेतकरी कर्जाचे पुनर्गठण न करता नवे- जुने करत असल्याचे निदर्शनास आले आहे़-आऱ एम़ दायमा, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.