शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

राम मंदिर उभारल्यास दक्षिण भारत तुटेल : डॉ.रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:08 IST

राम मंदिर उभारणीचा अट्टाहास आणि रावण दहनाच्या परंपरेमुळे दक्षिणेतील चारही राज्ये भारतापासून कायमची तुटतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिला.

श्रीरामपूर : राम मंदिर उभारणीचा अट्टाहास आणि रावण दहनाच्या परंपरेमुळे दक्षिणेतील चारही राज्ये भारतापासून कायमची तुटतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिला. देशात आता पूर्ण अराजक असल्याचा आरोप त्यांनी केला.महात्मा ज्योतीबा फुले तरूण मंडळाच्या वतीने येथील आझाद मैैदान येथे डॉ.कसबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.डॉ.कसबे म्हणाले, या देशात बाबरी मस्जिद विध्वंसापर्यंत कुठेही दहशतवादी कारवाया नव्हत्या. बाबरी ध्वंस ही पहिली दहशतवादी घटना आहे. आता पुन्हा अराजक पसरविले जात आहे. राम मंदिराचा नारा देण्यात आला आहे. यातून देशाचे विभाजन होण्याचा धोका आहे. दक्षिण भारतात द्रविडी, मूलनिवासींची संस्कृती आहे. ती राज्ये कायमची तुटली जाण्याचा धोका आहे.भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी बाबरी पाडण्याचे पाप केले. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा नमस्कार स्वीकारत नाहीत. अडवाणी यांच्या दुर्दशेला तेच कारणीभूत आहेत, अशी खोचक टीका डॉ.कसबे यांनी केली. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रातून तरूणांना भडकून देण्याचे काम केले. त्यांचे लिखाण हा इतिहास नाही अशी टीका त्यांनी केली. या देशात धर्म चिकित्सा केली जात नाही. यामुळेच तो मागे राहिला. शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर भाजप नेते बेताल विधाने करतात यावर डॉ.कसबे यांनी खंत व्यक्त केली. प्रत्येक महापुरूषाला अनुयायांनी जातीमध्ये विभागून टाकले. आपण ब्राम्हण समाजाविरोधात बोलत नाही, तर केवळ अनिष्ट व चुकीच्या गोष्टींचा समाचार घेतो. महात्मा फुले यांनी स्त्रीयांना आत्मसन्मान दिला. ती या देशातील मोठी क्रांती होती, असे डॉ.कसबे शेवटी म्हणाले.माजी आमदार दौलतराव पवार, उपनगराध्यक्ष करण ससाणे, उद्योजक विजयराव कुदळे, कामगार नेते अविनाश आपटे, डॉ.वसंत जमधडे, पुंडलिक गिरमे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, प्राचार्य शंकरराव गागरे, पं.स सदस्या डॉ.वंदना मुरकुटे, नगरसेविका भारती कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्तविक प्रभाकर भोंगळे यांनी केले. कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर