शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

राम मंदिर उभारल्यास दक्षिण भारत तुटेल : डॉ.रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 18:08 IST

राम मंदिर उभारणीचा अट्टाहास आणि रावण दहनाच्या परंपरेमुळे दक्षिणेतील चारही राज्ये भारतापासून कायमची तुटतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिला.

श्रीरामपूर : राम मंदिर उभारणीचा अट्टाहास आणि रावण दहनाच्या परंपरेमुळे दक्षिणेतील चारही राज्ये भारतापासून कायमची तुटतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिला. देशात आता पूर्ण अराजक असल्याचा आरोप त्यांनी केला.महात्मा ज्योतीबा फुले तरूण मंडळाच्या वतीने येथील आझाद मैैदान येथे डॉ.कसबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.डॉ.कसबे म्हणाले, या देशात बाबरी मस्जिद विध्वंसापर्यंत कुठेही दहशतवादी कारवाया नव्हत्या. बाबरी ध्वंस ही पहिली दहशतवादी घटना आहे. आता पुन्हा अराजक पसरविले जात आहे. राम मंदिराचा नारा देण्यात आला आहे. यातून देशाचे विभाजन होण्याचा धोका आहे. दक्षिण भारतात द्रविडी, मूलनिवासींची संस्कृती आहे. ती राज्ये कायमची तुटली जाण्याचा धोका आहे.भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी बाबरी पाडण्याचे पाप केले. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा नमस्कार स्वीकारत नाहीत. अडवाणी यांच्या दुर्दशेला तेच कारणीभूत आहेत, अशी खोचक टीका डॉ.कसबे यांनी केली. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रातून तरूणांना भडकून देण्याचे काम केले. त्यांचे लिखाण हा इतिहास नाही अशी टीका त्यांनी केली. या देशात धर्म चिकित्सा केली जात नाही. यामुळेच तो मागे राहिला. शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर भाजप नेते बेताल विधाने करतात यावर डॉ.कसबे यांनी खंत व्यक्त केली. प्रत्येक महापुरूषाला अनुयायांनी जातीमध्ये विभागून टाकले. आपण ब्राम्हण समाजाविरोधात बोलत नाही, तर केवळ अनिष्ट व चुकीच्या गोष्टींचा समाचार घेतो. महात्मा फुले यांनी स्त्रीयांना आत्मसन्मान दिला. ती या देशातील मोठी क्रांती होती, असे डॉ.कसबे शेवटी म्हणाले.माजी आमदार दौलतराव पवार, उपनगराध्यक्ष करण ससाणे, उद्योजक विजयराव कुदळे, कामगार नेते अविनाश आपटे, डॉ.वसंत जमधडे, पुंडलिक गिरमे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, प्राचार्य शंकरराव गागरे, पं.स सदस्या डॉ.वंदना मुरकुटे, नगरसेविका भारती कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्तविक प्रभाकर भोंगळे यांनी केले. कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर